मुंबई : मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रीमंडळातील मंत्र्याएवढा कुणी केला नव्हता. त्याचा उल्लेख थेट सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून केला गेला. राज्यात काही योजना करायच्या आहेत परंतु आपल्या हातात नाही. तसेच महाविकास आघाडी फक्त घोषणा देत नाही तर काम करून दाखवत आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो, तसंच मुंबईत आमदारांना घरं देणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केलं होतं. आता याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणुकसाठी भाजपचा नवा डाव; भाजप करणार ‘चाय पे चर्चा’
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं आज चिपी विमानतळावर आगमन झालं. त्यांचा आजपासून तीन दिवस कोकण दौरा आहे. त्यांचा पहिल्याच दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात सत्कार करण्यात आला. देवगड नगरपंचायत मधील नवनिर्वाचित सदस्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी कोणत्याही आमदारांना मोफत घरं मिळत नाहीत. यांनी स्पष्ट केलंय. असा पुनर उच्चार काढला.
‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वत: च्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते; भाजप नेत्याची टीका
सिंधुदुर्गमधील पर्यटनावर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर एमएमआरच्या बाहेरील आमदारांना घरं मिळणार आहेत. असंही वक्तव्य त्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
आपण किती खरं बोलतो ते देवाच्या दरबारात तपासून घेतलं पाहिजे :संजय राऊत
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की राज्य सरकारकडून देण्यात येणारं कोणतंही घरं भाजप घेणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर यावरून राज्यात राजकीय वातावरण थोडसं चिघळल्याचं दिसून आलं.
Read also:
- अखेर मलिक बिनखात्याचे मंत्री ; राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडे त्यांचा कारभार सोपवला
- “शरद पवार अन् रामराजे यांच्या पुढे हरलो नाही, माझा आंडू पांडूनी नाद करू नये”
- राज्य सरकारवर टीका करत पंकजा मुंडेंचा भाजपलाही घरचा आहेर; म्हणाल्या..;
- ” तुमच्या नाकर्तेपणाचा कारभार आयुक्तांवर थोपवू नका “; राष्ट्रवादीचा गिरीश बापटांवर हल्लाबोल
- पंतप्रधानांनीच चित्रपट बघण्याचं आव्हान केलं तर एकवाक्यता टिकणार कशी ? शरद पवार