मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गटातील आमदारांची फार मोठी गोची झाली आहे. अनेक महिन्यापासून मंत्रीपदाची आस लावून बसलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांच्या अगोदर राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रिमंडळात समावेश करून घेतला. यानंतर शिंदे गटातील नेते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं,” राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला डिवचलं
एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी – काॅंग्रेसचं कारण देत शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विरोधात अजित पवारांनी बंड पुकारून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे आता शिंदे गटाकडून आता नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच जर ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद आला तर आम्ही विचार करू असं शिंदे गटातील नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अजित पवारांमुळे भाकरी करपली आता दुसरी तयार करू”, बच्चू कडूंचं मोठं विधान
दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदेंसह १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात लवकर निर्णय घ्यावा, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह शिंदेंच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यातच आता शिंदे गटातील नेते पुन्हा ठाकरे गटात परतण्याचा संकेत मिळत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…विश्वासू नेत्यांनी दगा दिला, शरद पवार आक्रमक, पहिली सभा त्याच बंडखोराच्या मतदारसंघात
हेही वाचा…राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण ? कारण आले समोर
हेही वाचा…पुण्यातील राष्ट्रवादीचे ३०० ते ३५० कार्यकर्ते मुंबईत जाणार, तीन ठराव मंजुर, पाठिंबाही ठरला
हेही वाचा…१७२ आमदार असतांना पुन्हा ‘अजित पवारांना घ्यायची गरज काय? शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड महेश लांडगे अन् भाजपाच्या वर्चस्वाला धक्का..! राज्यातील बदलत्या समिकरणामुळे स्थानिक पातळीवर फटका