पुणे : राज्यात जे काही झालं आहे ते अत्यंत किळसवानं झालेलं आहे. जनमताचा कौल तुम्ही घेतला तर प्रत्येक घरामध्ये शिव्या ऐकायला येतील. दुसरे काही ऐकायला येणार नाही. कुणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात गेल्यात काही कळत नाही .याची सुरुवात शरद पवार यांनी केली 78 साली शेवट त्यांच्यावरच होतो आहे. असं प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.
हेही वाचा…“माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नका,” शरद पवारांचा अजित पवारांना “दे धक्का”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, परवाच्या दिवशी अजित पवार यांनी स्टेटमेंट केलं होतं. शरद पवार यांचे होर्डिंग वर फोटो लावा हे अनाकलनीय आहे. सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही. असं मी म्हटलेलं आहे. ही गोष्ट काल काय अचानक घडलेली नाही. ही गोष्ट गेली कित्येक दिवस चालू होती. जे काही घडलेलं आहे असं यापूर्वी राज्यात कधी घडलं नाही . घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं माहिती नाही. तसेच उद्धव-राज युती असं काही बैठकीत झालेलं नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री ‘या’ नात्याने अंतिम निर्णय ‘एकनाथ शिंदे’ घेतील”, पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारल्यानंतर आता राज्यात मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. राज्यात आता राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट तयार झाला आहे. यातच नाशिकमध्ये कार्यालयावरून दोन्ही गटामध्ये मोठा राडा झाला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती सध्या भयानक परिस्थितीमध्ये गेल्याचं दिसत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांमुळे भाकरी करपली आता दुसरी तयार करू”, बच्चू कडूंचं मोठं विधान
हेही वाचा…“..त्या दिवशी राजकारणातून निवृत्त होईल”, आव्हाडांना दिलीप बनकराचं उत्तर, राष्ट्रवादीत संघर्ष पेटला
हेही वाचा…अजित पवारांचा राष्ट्रवादीत बंड..! “हा” अख्खा जिल्हा शरद पवारांच्या पाठीमागे उभा राहिला
हेही वाचा…भाजपला पाठिंबा देण्याचे ते पत्र जयंत पाटलांनी दिलंच नाही, शरद पवारांना एकटं सोडण्याचा होता प्लॅन
हेही वाचा…राष्ट्रवादीत संघर्ष पेटला..! दोन गटात मोठा राडा, शरद पवार अन् अजित पवार गट आमनेसामने