मुंबई : शिंदे गटातील आमदार मंत्रिपदाची आस लावून बसलेले असतांना राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने आता मोठी नाराजी आमदारांमध्ये दिसून येत आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी तर कॅबिनेट मंत्रीपदाची इच्छा वारंवार बोलून दाखवली होती. परंतु अद्याप त्यांची ही इच्छा पुर्ण झाली नाही. यावर त्यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री ‘या’ नात्याने अंतिम निर्णय ‘एकनाथ शिंदे’ घेतील”, पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
मला वाटतंय की जनतेलाच काय पण आम्हालाही हे परिवर्तन एक धक्काच होता. ज्या राष्ट्रवादीवर टीका केली, तिच्यासोबत आल्याने आता जनतेला हे पटवून देणं आणि त्यांनी स्विकारणं हे फार मोठं आव्हान आहे. याला वेळ लागेल. नाराजी होण्याचं फार काही कारण नाही, तिघेही नेते मोठे नेते आहेत, ते निर्णय घेतील आणि आम्ही त्याचं पालन करू. अस बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…अजित पवार वित्तमंत्री झाले तर विरोधकांच्या कामांना स्थगिती देणार का ?
अजित पवार यांच्या निधी वाटपावरून थोडीशी नाराजी होती, पण ती दुर होईल, असं आश्वासन मिळालं आहे. त्यामुळे भविष्यात मोठे बदल पाहायला मिळतील. भाकरी करपायच्या आधीच आम्ही भाकरी पालटून टाकू, दुसरी भाकरी करू असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..त्या दिवशी राजकारणातून निवृत्त होईल”, आव्हाडांना दिलीप बनकराचं उत्तर, राष्ट्रवादीत संघर्ष पेटला
हेही वाचा…अजित पवारांचा राष्ट्रवादीत बंड..! “हा” अख्खा जिल्हा शरद पवारांच्या पाठीमागे उभा राहिला
हेही वाचा…भाजपला पाठिंबा देण्याचे ते पत्र जयंत पाटलांनी दिलंच नाही, शरद पवारांना एकटं सोडण्याचा होता प्लॅन
हेही वाचा…राष्ट्रवादीत संघर्ष पेटला..! दोन गटात मोठा राडा, शरद पवार अन् अजित पवार गट आमनेसामने
हेही वाचा…“माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नका,” शरद पवारांचा अजित पवारांना “दे धक्का”