मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये येण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गटाची फार मोठी गोची झाली आहे. अजित पवार यांच्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांनी आपली नाराजी उघडउघडपणे दाखवली आहे. याच पार्श्वभूमीवर आमच्याकडे १७२ आमदार असतांना पुन्हा अजित पवारांना घ्यायची गरज काय? असा सवाल शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
हेही वाचा…भाजपला पाठिंबा देण्याचे ते पत्र जयंत पाटलांनी दिलंच नाही, शरद पवारांना एकटं सोडण्याचा होता प्लॅन
मुळात आम्हाला बहुमताची गरज नव्हती, मग अजितदादांना का घेतलं? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आमच्याकडे १७२ आमदार असताना पुन्हा अजित पवार यांना घ्यायची गरज काय? परंतु राजकारणात काही समीकरणं बसवावी लागतात. मग येणारी विधानसभा असो वा लोकसभा असो. प्रत्येक माणसाची एक ताकद असते. पक्षाची ताकद तर असतेच पण वैयक्तिक नेत्याचीही ताकद असते. ती ताकद एकत्रित झाल्यानंतर आणखी जागा वाढणार. असं संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीत संघर्ष पेटला..! दोन गटात मोठा राडा, शरद पवार अन् अजित पवार गट आमनेसामने
सध्याच्या मंत्रिमंडळामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. मग हे मंत्रीमंडळ चालेल कसं ? यांना एवढी मंत्रीपद दिली, मग तुम्हाला काय मिळेल? त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. हे सगळं प्लॅन करून केलं आहे. म्हणून हा मंत्रीमंडळ विस्तार झाला. पुन्हा रविवारपर्यंत दुसरी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड महेश लांडगे अन् भाजपाच्या वर्चस्वाला धक्का..! राज्यातील बदलत्या समिकरणामुळे स्थानिक पातळीवर फटका
हेही वाचा…“घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं,” राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला डिवचलं
हेही वाचा…“अजित पवारांमुळे भाकरी करपली आता दुसरी तयार करू”, बच्चू कडूंचं मोठं विधान
हेही वाचा…“..त्या दिवशी राजकारणातून निवृत्त होईल”, आव्हाडांना दिलीप बनकराचं उत्तर, राष्ट्रवादीत संघर्ष पेटला
हेही वाचा…अजित पवारांचा राष्ट्रवादीत बंड..! “हा” अख्खा जिल्हा शरद पवारांच्या पाठीमागे उभा राहिला