मुंबई : राज्यात सध्या मनसे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये जोरदार राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या मागील सभेत राष्ट्रवादी काॅंग्रेसवर प्रखर शब्दात टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांनी कडाडून टिका केली. त्यावर धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांना अर्धवटराव म्हणून संबोधलं होतं. त्यावर आता मनसेकडून धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
“उद्धव ठाकरे जून महिन्याच्या अगोदर मुख्यमंत्रिपदावरून जाणार”; नारायण राणेंची भविष्यवाणी
मनसे नेते अमेय खोपकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची अर्धवटराव म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या तात्या विंचू’ ओम फट स्वाहा करणार आहेत. राजसाहेबांनी दे दणादण करायला आता कुठे सुरूवात केली आहे. लवकरच तुमचा थरथराट होणार असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना हाणला आहे.
“आमच्या रक्तात हिंदूत्त्व, त्यासाठी कोणतीही शाल पांघरण्याची गरज नाही”; देवेंद्र फडणवीस
पुर्वी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुलींचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सूरू आहे. अर्थवटरावांचा खेळ सुरू आहे. अर्थवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे, आणि आता एकदा सीडी घुसली त्यामुळे अर्थवटराव शांत झाले. अशी मिश्किल शब्दात धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
“मी कोणाचे नाव घेत नाही, फक्त टोपी फेकतो”; शरद पवारांचं नाव न घेता चंद्रकांत पाटलांचा टोला
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडून सध्या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या विविध ठिकाणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते सवांद यात्रेत सहभागी होत आहेत. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस एक दिवस तरी मुख्यमंत्री असणार अशी आशा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे 100 आमदार निवडून आणण्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा स्वप्न देखील पूर्ण होणार असं त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता! मुंबई पोलिसांचा शोध सुरू
- संजय राऊतांना ‘ते’ व्यक्तव्य भोवण्याची शक्यता! न्यायालयात अवमान याचिका दाखल
- “राज ठाकरेंसोबत भाजप गेल्यास त्यांना महागात पडेल”; रामदास आठवलेंनी दिला इशारा
- “मागील 50 वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलीय”; संजय राऊतांचं राणेंंना प्रत्युत्तर
- “राज ठाकरेंचं सोयी अन् सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व”; मनिषा कांयदे यांचा राज ठाकरेंना टोला