मुंबई : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सध्या सरकारकडून करण्यात येत आहे. याला मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आज ओबीसी नेत्यांची बैठक भुजबळांनी मांडली असून दिवाळीनंतर राज्यभरात ओबीसींचे मोर्चे निघणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर आली.
हेही वाचा…ग्रामपंचायती निवडणुकीत ठाकरेंना मिळाल्या कमी जागा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक मुंबईत नुकतीच संपली आहे. छगन भुजबळ यांच्या निवास्थानी घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यातील अनेक ओबीसी नेते सहभागी झाले होते. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. कुणबी दाखले दिल्यामुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होणार असलं झाल्यास रस्त्यावरची लढाई सुरू करणार अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. तर दिवाळी संपल्यानंतर राज्यभर आंदोलन करणार असं विधान ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…‘या’ तालुक्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही, सगळ्या पक्षांना धक्का देत अपक्षांनी मारली बाजी
दरम्यान, दिवाळीनंतर ओबीसी समाजातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा होणार आहे. भुजबळांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत ओबीसी नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. मराठा- कुणबी दाखल्यांवरून ओबीसी नेत्यांनी सरकारला इशारा दिला आहे. तर जालन्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव समितीचा एल्गार मोर्चा आज काढण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भडक वक्तव्य करून भुजबळांनी परिस्थिती खराब करू नये”, महायुतीच्याच मंत्र्यांनी भुजबळांना दिला इशारा
हेही वाचा…“पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती सुसाट, जिल्ह्यात युतीची ताकद वाढली”
हेही वाचा…“जवा घोटाळे आणि भ्रष्टाचाराची होते नांगरट, तवा..,”ठाकरेंवर टिका, सुषमा अंधारेंचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते अन् ग्रामपंचायत निवडणुका..”, राऊतांनी महायुतीला डिवचलं
हेही वाचा…“पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा”, ग्रामपंचायत निकालानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया