पुणे : गेल्या काही दिवसापासून चर्चेत आलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे विरूद्ध आढळराव पाटील यांच्यात सामाना होणार आहे. सुरूवातीला आढळराव पाटलांच्या उमेदवारीला अजित पवार गटातील नेत्यांचा विरोध होता. मात्र अजित पवारांच्या शिष्टाईनंतर मोहिते-पाटील आणि आढळराव यांच्यात दिलजमाई झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…”मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक ;” भाजप प्रवेशावर अंबादास दानवेंचा पुर्णविराम
शिवाजीराव आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुक लढविण्यासाठी आमदार मोहिते पाटील यांची नाराजी होती. त्याचबरोबर माजी आमदार विलास लांडे यांनी देखील आढळरावांना विरोध केला होता. मात्र शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मोहिते पाटील यांच्यासह विलास लांडे यांची नाराजी दुर झाली आहे. आता अजित दादा जो आदेश देतील, ते काम करण्यास आम्ही तयार असल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आलीय.
हेही वाचा…कॉंग्रेसचा ‘हा’ नेता वर्ध्यातून तुतारीवर लोकसभा लढणार ; आघाडीत वर्ध्याचा जागेचा तिढा संपुष्टात
शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील विरूद्ध अमोल कोल्हे असा सामना होणार आहे. या मतदारसंघात महायुतीची अधिक ताकद दिसून येत आहे. त्याचबरोबर आढळराव पाटील यांना राजकारणाचा दिर्घ अनुभव असून आता अजितदादांचाही पाठिंबा असणार आहे. त्यामुळे कोल्हे यांना सत्ता राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अजित पवार गटाला एकूण सात जागा मिळाल्या आहेत. यामध्ये लक्षद्वीप, परभणी, शिरूर, रायगड, धाराशिव, बारामती, नाशिक किंवा सातारा या जागांचा समावेश आहे. परभणीत महादेव जानकर यांना अजित पवार गटाच्या कोट्यातून जागा देण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सोलापुरात राम सातपुते सेफ झोनमध्ये तर प्रणिती शिंदेंना बसणार मोठा फटका ; मराठा समाजाचा मोठा निर्णय
हेही वाचा…नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाद वाढला, भुजबळांच्या दाव्याने खळबळ, दुसऱ्या बाजूला मराठा समाजही आक्रमक
हेही वाचा…“शिवतारे जर असा युटर्न घेत असतील तर लोक त्यांना..”बारामतीतून माघार घेतल्याने शिवतारेंना पवारांनी डिवचलं
हेही वाचा…ना मुख्यमंत्र्यांचं ऐकलं, ना फडणवीसांचं ; ‘तो’ एक फोन आला अन् शिवतारेंनी बारामतीतून घेतली माघार
हेही वाचा…चंद्रपूरच्या जागेचा तिढा सुटला; प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार ; मात्र वडेट्टीवार समर्थक भाजपात दाखल