मुंबई : राज्यात शिवसेना पक्ष फुटीनंतर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माजी आमदार, खासदार पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच ठाकरे गटातून अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला आहे. यातच आता मुंबईमध्ये काॅंग्रेसला मोठा फटका बसला असून तीन माजी नगरसेवकांनी काॅंग्रेसमधून आपापले राजीनामे दिले आहेत.
हेही वाचा…“सत्ताकारण जरूर करावं पण.., ” सध्याच्या राजकारणावर गडकरींची नेत्यांना चपराक
मुंबई काॅंग्रेसमध्ये मागील काही दिवसापासून नाराजीचा सूर दिसून आला आहे. यामुळे काॅंग्रेसमधील तीन माजी नगरसेवकांनी आपापले राजीनामे दिले आहेत. यामध्ये माजी नगरसेविका पुष्पा कोळी, गंगा माने, बबु खान यांनी राजीनामा दिला आहे. काॅंग्रेसमधील तीन्ही नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यातच पदाधिकारी भास्कर शेट्टी यांनी पण आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा…शिंदेंच्या आमदारांचं ६ हजार पानी उत्तरात अनेक दाखले, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष्य
दरम्यान, राज्यात सध्या पक्षफुटीप्रकरणानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपसह शिंदे आणि अजित पवार गटाची महायुती झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्यासह, ठाकरे आणि काॅंग्रेस यांची महाविकास आघाडी कायम आहे. यातच आता आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामान रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“२०० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असलेले पहिलेच सरकार, बदल होणार नाही,” अजित पवारांचा विश्वास
हेही वाचा…“भाजप अन् मोदी यांची सत्ता काढून नव्या पिढीच्या हाती देणं महत्वाचं”, शरद पवारांचं सुचक विधान
हेही वाचा…“मी राजकारणात जागा घेण्यासाठी नाहीतर..,” राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले”, विरोधी पक्ष नेत्याचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“शरद पवारांचं राजकारण पाहता भाजपला ते कात्रजचा घाट दाखवतील”