मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात इंडियाची बैठक येत्या ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी देशातील प्रमुख २६ विरोधी पक्षातील नेते एकत्रित येणार आहे. या बैठकीचं नियोजन महाविकास आघाडीकडे देण्यात आलं आहे. त्याआधी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या बैठकीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी क्लिनचीट दिली, पण आता थेट जप्तीचे आदेश”, भाजप आमदाराच्या अडचणी वाढल्या
आज राजकारण अस्थिर झाले आहे. कुणाच्या शब्दावर, आश्वासनावर विश्वास कोणी ठेवू शकत नाही. भाजपने राजकारण नासवले. जनतेचा विश्वासघात केला. त्यांना जनताच जागा दाखवेल, इंडियाला चांगली संधी आहे. ईडी, सीबीआयच्या धाकाने गेलेले बिनबुडाचे लोटे आहेत. परिस्थिती शेवटच्या क्षणी फुट पडते. त्यावर ते आपला प्लॅन बी ठेवतात. आम्हाला धोका वाटण्याचं कारण नाही. स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले आहेत. लोकांशी देणं घेणं राहिलं नाही. असा शाब्दि टोलाही वडेट्टीवारांनी लगावला.
हेही वाचा…“काॅंग्रेसमधील काही ठराविक लोकांनी टार्गेट करून पक्षाच्या बाहेर काढलं”,सत्यजीत तांबेंचा आरोप
दरम्यान, लोक इंडियाच्या पाठीमागे असतील. भाजप सरकारची लोकप्रियता संपली आहे. शिंदे गट आमदार अपात्रतेबाबत जो निर्णय घ्यायचा तो अध्यक्ष घेतील. पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन चॅलेंज करण्याचा अधिकार आहे. मात्र १६ आमदार यात अपात्र होतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानला मुख्यमंत्री म्हणून गेले असते, बरं झालं असतं. जपानमधून ते काहीतरी आणतील अशी फार अपेक्षा करणे योग्य नाही. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांचं राजकारण पाहता भाजपला ते कात्रजचा घाट दाखवतील”
हेही वाचा…“सत्ताकारण जरूर करावं पण.., ” सध्याच्या राजकारणावर गडकरींची नेत्यांना चपराक
हेही वाचा…शिंदेंच्या आमदारांचं ६ हजार पानी उत्तरात अनेक दाखले, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष्य
हेही वाचा…शरद पवारांच्या विचारांपासून दुर जाणे म्हणजे गद्दारीच
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्र्यांचा महापालिका प्रशासनाला ‘बुस्टर’, महापालिका आयुक्तांना दिली कौतुकाची थाप