नाशिक : काॅंग्रेसमधील काही ठराविक लोकांनी मला टार्गेट करून पक्षाच्या बाहेर ढकललं आहे. परंतु आमच्या रक्तात काॅंग्रेस आहे. आमच्या विचारात काॅंग्रेस आहे. शंभर वर्षापासून आम्ही काॅंग्रेससोबत जोडले गेले आहेत. मला काही लोकांनी बाहेर ढकलले असेल तर ती पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की, माझ्यासारख्या लोकांशी संवाद साधला पाहिजे. असं विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सरकार खोटे बोलले व आता तोंडावर पडले”, भाजप आमदाराच्या साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश
विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सत्यजीत तांबे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. पक्षांच्या अंतर्गत राजकारणामुळे सत्यजीत तांबे यांना काॅंग्रेसमधून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर यावर बराच वेळा मोठा वाद घडून आला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आणि विजयी झालेत.
हेही वाचा…“काका-पुतण्या महाराष्ट्राला वेड्यात काढताहेत, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे डोकं फुटायची वेळ”
दरम्यान, नाशिक विधान परिषद निवडणुकीत माझ्यासंदर्भात कसे राजकारण झाले हे आपल्या सर्वांसमोर आहे. मी एकटाच नाही तर या देशात काॅंग्रेसमध्ये असणारे अनेक जण असे आहेत. ज्यांना टार्गेट केले जात आहेत. यावर पश्रश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे आहे. सध्याच्या राजकारणाची पातळी खालवली आहे. यामुळे नवीन राजकारण सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी युवकांनी राजकारणात यावे,असंही त्यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची ‘नो कमेंट्’
हेही वाचा…राष्ट्रवादीतून शरद पवारांनी अजित पवारांची केली हाकालपट्टी, भाजपसोबत जाणार नाही
हेही वाचा…“अजित पवारांना आता पुन्हा संधी नाही,” शरद पवारांचा मोठा घुमजाव
हेही वाचा…“शरद पवारांनी गुगली टाकली, भाजपसोबत जाणार नाही”
हेही वाचा…“महाविकास आघाडी महायुतीवर भारी…,” लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर