पुणे : भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे ५ कोटी ७८ लाख रूपये थकवल्यामुळे साखर आयुक्तालयाकडून जप्तीचे आदेश देण्यात आल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारकडून राहुल कुल यांना क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप राऊतांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा…“पक्ष फोडण्याचे आमच्यात संस्कार नाहीत,” चंद्रशेखर बावनकुळेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
भाजप आमदार राहुल कुल यांनी पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. या प्रकरणाबाबत अधिक चौकशी करण्याची मागणी राऊतांनी पत्राद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. राहुल कुल यांनी २०१६ ते २०२२ या काळाता गळीत हंगाम बंद असताना खुल्या बाजारात साखरेची विक्री केली. इतकेच नव्हे तर कारखान्याने बॅंकांचे थकीच कर्ज बुडवल्याचा आरोप राऊतांनी केलाय.
हेही वाचा…डिनरमध्ये झुणका भाकर, वडापाव, अन् तुतारी, नाशिक ढोलच्या गजरात इंडियाच्या नेत्यांचं मुंबईत जंगी स्वागत होणार
संजय राऊत यांनी याबाब एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे. दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे ५ कोटी ७८ लाख रूपये थकवल्यामुळे साखर आयुक्तालयाकडून जप्तीचे आदेश देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या लढ्याचा हा विजय आहे. प्रश्न इतकाच आहे की आमदार राहुल कूल यांना वाचण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने विधानसभेत कुल यांना क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला. सरकार खोटे बोलले व आता तोंडावर पडले. राहुल कुल यांना ५०० कोटींचे मनी लॉंड्रिंग केले आहे. सिद्ध होईल. असंही राऊतांनी म्हटलंय.
दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर शेतकर्यांचे ५ कोटी ७८ लाख रु थकवल्यामुळे साखर आयुक्तालयाकडुन जप्तीचे आदेश..! शेतकऱ्यांच्या लढ्याचा हा विजय. प्रश्न इतकाच आहे आमदार राहुल कूल यांना वाचवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने विधानसभेत आमदार कूल यांना क्लीन चीट देण्याचा…
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“काका-पुतण्या महाराष्ट्राला वेड्यात काढताहेत, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे डोकं फुटायची वेळ”
हेही वाचा…“शड्डू ठोकलाय भावड्या, कोल्हापूरच्या आखाड्यात येतोय तेल लावलेला पैलवान”
हेही वाचा…“छगन भुजबळांना मंत्रिपदावरून हटवा”, ब्राह्मण महासंघाची मागणी
हेही वाचा…बंडखोरांना जनता धडा शिकवणार? लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा सर्व्हे, कोणाला किती जागा ?
हेही वाचा…“पक्षात कोणतीही फुट नाही” शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा अर्थ काय ?