मुंबई : राज्यात मागील दोन वर्षात राज्यातील सर्वात मोठे दोन पक्ष फुटल्याने राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. याचा संपुर्ण परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. इंडिया टुडे आणि सी व्होटरने केलेल्या निवडणुकांच्या सर्व्हेनुसार पक्ष फुटीचा परिणाम राजकीय पक्षांवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचं नाफेडच्या अधिकाऱ्यांना पत्र, कांदा प्रश्नी केली ‘ही’ मागणी
राज्यात आता लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीला २८ तर महायुतीला 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त जागा १५ जागा भाजपला तर ११ जागा काॅंग्रेसला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाला मिळून १८ जागा तर पाच जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा…“भारतीय कुस्ती खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत,” UWW ची मोठी कारवाई, अमोल कोल्हे संतापले
दरम्यान, देशात लोकसभा निवडणुका झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत एनडीएला 306 तर इंडिया आघाडीला 193 जागा मिळण्याचा अंदाज इंडिया टु़डे आणि सी व्होटरने घेतलेल्या सर्व्हेनुसार सांगण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पक्षात कोणतीही फुट नाही” शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा अर्थ काय ?
हेही वाचा…“पक्ष फोडण्याचे आमच्यात संस्कार नाहीत,” चंद्रशेखर बावनकुळेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
हेही वाचा…डिनरमध्ये झुणका भाकर, वडापाव, अन् तुतारी, नाशिक ढोलच्या गजरात इंडियाच्या नेत्यांचं मुंबईत जंगी स्वागत होणार
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांचं मरण होतंय,” वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायचीय”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा