मुंबई : राष्ट्रवादीच्या पक्षफुटीबाबत केलेल्या वक्तव्यावरून काल संपुर्ण राजकारण शरद पवार यांच्या भोवती फिरत आहेत. अजित पवार आमचेच नेते आहेत. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्याला फुट म्हणत नाही. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. याच गोष्टीला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दुजोरा दिल्याने राज्यात सध्या एकच चर्चा सुरू आहे. त्यावरून आता ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…बंडखोरांना जनता धडा शिकवणार? लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा सर्व्हे, कोणाला किती जागा ?
शरद पवार मोठे नेते असून जेव्हा ती एखादी भूमिका घेतात. तेव्हा त्यामागचा अर्थ शोधण्यासाठी अनेकांची हयात गेलीय. शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयाचा अर्थ काढण्यासाठी अनेकांनी आपला मेंदू खाजवलेला आहे. परंतु त्याचा कधी उलगडा झाला नाही. राष्ट्रवादीच्या विरोधातली नेत्यांच्या विरोधात ते मैदानी लढाई लढतातच परंतु दुसऱ्या बाजूला ते कायदेशीर लढाई देखील लढत आहेत. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“पक्षात कोणतीही फुट नाही” शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा अर्थ काय ?
शरद पवार प्रत्येक पाऊस सावधगिरीने उचलत आहेत. शरद पवार भाजपसोबत जाणार नाही. त्यामागचा त्याचा इतिहास देखील आहे. ते इंडियासोबत आहेत. परंतु त्यांची भूमिका स्पष्ट करत असतात. ते समुद्रामध्ये सुई टाकत असतात. अन् त्यात तुम्ही सुई शोधत बसा. असा वातावरण तयार करत असतात.त्यांना तेल लावलेले पैलवान म्हणून ओळखतात. म्हणून ते शेवटपर्यंतच लढाई लढणार असंही भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महाविकास आघाडी महायुतीवर भारी…,” लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“सरकार खोटे बोलले व आता तोंडावर पडले”, भाजप आमदाराच्या साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश
हेही वाचा…“काका-पुतण्या महाराष्ट्राला वेड्यात काढताहेत, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे डोकं फुटायची वेळ”
हेही वाचा…“शड्डू ठोकलाय भावड्या, कोल्हापूरच्या आखाड्यात येतोय तेल लावलेला पैलवान”