मुंबई : राज्यात मागील दोन वर्षात राज्यातील सर्वात मोठे दोन पक्ष फुटल्याने राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. याचा संपुर्ण परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. इंडिया टुडे आणि सी व्होटरने केलेल्या निवडणुकांच्या सर्व्हेनुसार पक्ष फुटीचा परिणाम राजकीय पक्षांवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा…“पक्षात कोणतीही फुट नाही” शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा अर्थ काय ?
राज्यात आता लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीला २८ तर महायुतीला 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त जागा १५ जागा भाजपला तर ११ जागा काॅंग्रेसला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाला मिळून १८ जागा तर पाच जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा…“पक्ष फोडण्याचे आमच्यात संस्कार नाहीत,” चंद्रशेखर बावनकुळेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
दरम्यान, देशात लोकसभा निवडणुका झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत एनडीएला 306 तर इंडिया आघाडीला 193 जागा मिळण्याचा अंदाज इंडिया टु़डे आणि सी व्होटरने घेतलेल्या सर्व्हेनुसार सांगण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सरकार खोटे बोलले व आता तोंडावर पडले”, भाजप आमदाराच्या साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश
हेही वाचा…“काका-पुतण्या महाराष्ट्राला वेड्यात काढताहेत, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे डोकं फुटायची वेळ”
हेही वाचा…“शड्डू ठोकलाय भावड्या, कोल्हापूरच्या आखाड्यात येतोय तेल लावलेला पैलवान”
हेही वाचा…बंडखोरांना जनता धडा शिकवणार? लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा सर्व्हे, कोणाला किती जागा ?