मुंबई : शिवसेनेच्या एका गटाने पक्षाचा विचार, भूमिका बाजूला ठेऊन भाजपसोबत हातमिळवणी केली. हा पक्षद्रोह झाला आहे. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये देखील फुट पडली आहे. पक्षाच्या विचारधारेविरूद्ध भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे अजित पवारांसह काही नेत्यांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. यातच राष्ट्रवादीत दोन प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे ही फुट नाही का ? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
हेही वाचा…“शड्डू ठोकलाय भावड्या, कोल्हापूरच्या आखाड्यात येतोय तेल लावलेला पैलवान”
राष्ट्रवादीच्या एका गटाने इडीच्या धाकामुळे भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. लोकांनी ठरवलं आहे की राष्ट्रवादीमध्ये फुट पडली आहे. अजित पवार यांचा गट कुठे आहे, याचा आम्हाला काही फरक पडत नाही. राष्ट्रवादीत दोन प्रदेशाध्यक्ष असून आम्ही फक्त शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशीच चर्चा करू, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“छगन भुजबळांना मंत्रिपदावरून हटवा”, ब्राह्मण महासंघाची मागणी
दरम्यान, शरद पवार ज्या विचारधारेतून आले आहेत. यशवंतराव चव्हाण यांना ते गुरू मानतात. त्या विचारधारेत त्यांना भाजपचा विचार नाही. त्यामुळे शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नाही, असंही राऊतांनी म्हटलंय. सुप्रीया सुळे आणि इतर नेत्यांच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये कोणताही संभ्रम नाही. शरद पवार सुध्दा पक्ष फुटीनंतर पक्षाची सुत्रे हाती घेतली आहे. त्यामुळे त्यांनाही जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांना आता पुन्हा संधी नाही,” शरद पवारांचा मोठा घुमजाव
हेही वाचा…“शरद पवारांनी गुगली टाकली, भाजपसोबत जाणार नाही”
हेही वाचा…“महाविकास आघाडी महायुतीवर भारी…,” लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“सरकार खोटे बोलले व आता तोंडावर पडले”, भाजप आमदाराच्या साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश
हेही वाचा…“काका-पुतण्या महाराष्ट्राला वेड्यात काढताहेत, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे डोकं फुटायची वेळ”