पुणे : भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे ५ कोटी ७८ लाख रूपये थकवल्यामुळे साखर आयुक्तालयाकडून जप्तीचे आदेश देण्यात आहे. याआधी या प्रकरणाबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचारा आरोप लावण्यात आला होता. मात्र या प्रकरणात त्यांना क्लिनचीट देण्यात आली आहे.
हेही वाचा…“महाविकास आघाडी महायुतीवर भारी…,” लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
भाजप आमदार राहुल कुल यांनी पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. या प्रकरणाबाबत अधिक चौकशी करण्याची मागणी राऊतांनी पत्राद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. राहुल कुल यांनी २०१६ ते २०२२ या काळाता गळीत हंगाम बंद असताना खुल्या बाजारात साखरेची विक्री केली. इतकेच नव्हे तर कारखान्याने बॅंकांचे थकीच कर्ज बुडवल्याचा आरोप राऊतांनी केलाय.
हेही वाचा…“सरकार खोटे बोलले व आता तोंडावर पडले”, भाजप आमदाराच्या साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश
संजय राऊत यांनी याबाब एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे. दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे ५ कोटी ७८ लाख रूपये थकवल्यामुळे साखर आयुक्तालयाकडून जप्तीचे आदेश देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या लढ्याचा हा विजय आहे. प्रश्न इतकाच आहे की आमदार राहुल कूल यांना वाचण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने विधानसभेत कुल यांना क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला. सरकार खोटे बोलले व आता तोंडावर पडले. राहुल कुल यांना ५०० कोटींचे मनी लॉंड्रिंग केले आहे. सिद्ध होईल. असंही राऊतांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“काॅंग्रेसमधील काही ठराविक लोकांनी टार्गेट करून पक्षाच्या बाहेर काढलं”,सत्यजीत तांबेंचा आरोप
हेही वाचा…शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची ‘नो कमेंट्’
हेही वाचा…राष्ट्रवादीतून शरद पवारांनी अजित पवारांची केली हाकालपट्टी, भाजपसोबत जाणार नाही
हेही वाचा…“अजित पवारांना आता पुन्हा संधी नाही,” शरद पवारांचा मोठा घुमजाव