मुंबई : राज्यात मागील काही वर्षापासून पक्षफुट, आरोप-प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यामुळे राज्यातील जनता वैतागून गेल्याची दिसत आहेत. यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांच्या चांगलाचं समाचार घेतलाय.
हेही वाचा…शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची ‘नो कमेंट्’
समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण, सेवाकारण हे राजकारण आहे. सध्या जे सुरू आहे, ते सत्ताकारम आहे. सत्ताकारण नक्की करावं, पण, सेवाकारण आणि विकासकारण केल्यावर समाजिक, आर्थिक, परिवर्तन होईल, असं म्हणत नितीन गडकरी यांनी राज्यातील भाजपसह सर्वच नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावर आता राज्यातील नेते काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीतून शरद पवारांनी अजित पवारांची केली हाकालपट्टी, भाजपसोबत जाणार नाही
दरम्यान, करोना काळात आम्ही पैसे गोळा करून अन्नधान्य आणि किराणा माल आदिवासी भाग आणि मेळघाटात देण्याचं काम केलं. ‘आपला परिसर, आपला विकास’ या मोहिमेअंतर्गत अतिदुर्गम भागातील ५ तरुणांची निवड केली. त्यांना स्कॉलरशिपसह ५ वर्षासाठी प्रत्येक महिन्याला १० हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे. तर, अंजनगाव-सुर्जी येथील ११५ तरुणी-तरुणींनाही मदत करत आहोत. मी सगळ्या खासदार, आमदार, जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांना सतत आवाहन करतो की, हेच राजकारण आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंच्या आमदारांचं ६ हजार पानी उत्तरात अनेक दाखले, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष्य
हेही वाचा…शरद पवारांच्या विचारांपासून दुर जाणे म्हणजे गद्दारीच
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्र्यांचा महापालिका प्रशासनाला ‘बुस्टर’, महापालिका आयुक्तांना दिली कौतुकाची थाप
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी क्लिनचीट दिली, पण आता थेट जप्तीचे आदेश”, भाजप आमदाराच्या अडचणी वाढल्या
हेही वाचा…“काॅंग्रेसमधील काही ठराविक लोकांनी टार्गेट करून पक्षाच्या बाहेर काढलं”,सत्यजीत तांबेंचा आरोप