यवतमाळ : तेलंगणाचे मुख्यमंत्री एस. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात पाय पसरू लागली आहे. उद्या नागपुर येथे महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी १ वाजता शहरात आगमन झाल्यानंतर साई मंदिराजवळील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
हेही वाचा…“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मनसैनिकांनी हनुमानाला घातला नवस,” राष्ट्रवादीची टिका
धाराशिव येथील भाजपच्या माजी जिल्ह्याध्यक्षा अर्चणा अंबुरे यांनी चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. अर्चणा अंबुरे यांच्या आधी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी बीआरएस मध्ये प्रवेश करत राज्यातील राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढवली आहे. याआधी पुर्व विदर्भाचे समन्वयक ज्ञानेश वाकुडकर, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार दीपक आत्राम, राजू तोडसाम, वसंतराव बोंडे, चरम वाघमारे, निखिल देशमुख, जावेद हबीब, संजय बोरकर, मतीन तमन्ना, आदिंच्या नेतृत्वाखाली पक्षाचे झेंडे, पोस्टर्स, बॅनर्सद्वारे बीआरएसने वातावरण निर्मिती केली आहे.
हेही वाचा…“४८ मतदारसंघापैकी हे २१ लोकसभा मतदारसंघ काॅंग्रेससाठी पोषक”, काॅंग्रेसचा निवडणुकीसाठी रोडमॅप ठरला
दरम्यान, अलिकडेच के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीकडून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात ताकद वाढविली आहे. पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविलेल्या भगिरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंबाबत बेडकाची भाषा शिंदे गटाने कदापी खपवून घेऊ नये”
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंसोबत फडणवीसांची तुलना , हे थोडं अचंबित करणारं”, बावनकुळे
हेही वाचा…“नुसत्या नकला करून मुख्यमंत्री होता येत नाही”, आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला
हेही वाचा…“शिवसेना-भाजप वाद मिटवण्यासाठी शिंदे समिती नेमणार”, शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेपर्यंत शांत बसणार
हेही वाचा…महायुतीत ठिणगी…! एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र वाटलं का ? भाजपच्या खासदाराचा सवाल