मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहेत. यातच कालच्या शिवसेनेच्या जाहिरातीवरून भाजपचे नेते नाराज झाल्याने शिंदे आणि फडणवीसांच्या महायुतीत अस्वस्थता पसरल्याचं दिसत आहे. यातच शिवसेना आणि भाजपमधील वाद टाळण्यासाठी दोन्ही पक्षांतील वरिष्ट नेत्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं समजत आहे.
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी महेश लांडगे लागले कामाला..! ओझरमध्ये “श्री गणेशा”, सोबतीला भाजपची फौज
मागील काही दिवसापासून शिंदे आणि फडणवीस यांच्या महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. सुरूवाताली कल्याण लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपात धुसफुस सुरू झाली. त्यानंतर काल देवेंद्र फडणवीस पेक्षा एकनाथ शिंदे यांना जास्त मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता असल्याचं जाहिरातीतून दाखवण्यात आलं. त्यावरून भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली.
हेही वाचा…“महाराष्ट्रातच नाही तर या राज्यांतही मित्रपक्षांचं भाजपसोबत बिनसलं” मोदींना मोठा धक्का बसण्याची शक्यता
दरम्यान, शिवसेना आणि भाजपमधील वाद मिटवण्यासाठी काल एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा आपल्या पक्षातील आमदार, खासदार आणि जिल्ह्याप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांची समिती स्थापन करणार असल्याचं शिंदेंनी सांगितले. एकीकडे युतीत मिठाचा खडा पडू नये म्हणून काळजी घेणार असल्याचे सांगतानाच शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाला दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याची देखील घोषणा केली.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीत ठिणगी…! एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र वाटलं का ? भाजपच्या खासदाराचा सवाल
हेही वाचा…“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मनसैनिकांनी हनुमानाला घातला नवस,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…“४८ मतदारसंघापैकी हे २१ लोकसभा मतदारसंघ काॅंग्रेससाठी पोषक”, काॅंग्रेसचा निवडणुकीसाठी रोडमॅप ठरला
हेही वाचा…केंद्रात ‘मोदी’ भाकरी फिरवणार, महाराष्ट्रात ‘या’ राज्यसभेच्या खासदारांना औटघटका ?
हेही वाचा…“इजा कानाला झालेली नव्हती तर मनाला झाली होती, त्यामुळेच आज पुन्हा नवीन जाहिरात”