नवी दिल्ली : विरोधकांची संपुर्ण देशात सुरू असलेली रणनीती पाहता भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत वेगळा प्लॅन करण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान संपुर्ण देशात भाकरी फिरवणार असल्याचे संकेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत. देशात सध्या असलेल्या सर्व राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना लोकसभेची निवडणुक लढवण्यास तयार ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…राज्यात आज निवडणुका झाल्यास काय होणार ? सर्वात मोठा एक्झिट पोल आला पुढे, शिंदेंचं काय होणार?
सलग दोन लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जादुई किमीया करत सत्ता स्थापन केली. मात्र पुढच्या निवडणुकीसाठी भाजप सावध पावलं टाकत आहेत. त्यामुळेच केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना सर्व मंत्र्यांना आणि राज्यसभेच्या खासदारांना लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी आपापले मतदारसंघ निवडून ठेवण्यास सांगितले आहे. यामुळे अनेक मंत्र्यांना आणि खासदारांना औटघटकेचे ठरण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
हेही वाचा…मोदींना जिंकवण्यासाठी भाजप ‘ह्या’ खासदारांचे तिकीट कापणार, बड्या नेत्याचं वक्तव्य
दरम्यान, महाराष्ट्रात पीयुष गोयल, डॉ. भागवत कराड, आणि नारायण राणे यांच्याकडे मंत्रीपद असून तिन्ही मंत्री हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढविणार त्याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर निर्मला सीतारमण व एस जयशंकर, अश्विनी वैष्णव व धर्मेंद्र प्रधान, सर्बांनद सोनोवाल व विप्लव देव, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडविया व पुरूषोत्तम रूपाला, भूपेंद्र यादव या मंत्र्यांना आता लोकसभा निवडणुकीसाठी आपापले मतदार संघ निवडावे लागण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“इजा कानाला झालेली नव्हती तर मनाला झाली होती, त्यामुळेच आज पुन्हा नवीन जाहिरात”
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी महेश लांडगे लागले कामाला..! ओझरमध्ये “श्री गणेशा”, सोबतीला भाजपची फौज
हेही वाचा…“महाराष्ट्रातच नाही तर या राज्यांतही मित्रपक्षांचं भाजपसोबत बिनसलं” मोदींना मोठा धक्का बसण्याची शक्यता
हेही वाचा…“कमी मार्काने पास झालो हे जाहिरातबाजीतून सांगणारा शिंदेंचा पहिलाच पक्ष”,सुप्रिया सुळेंनी उडवली शिंदेंची खिल्ली
हेही वाचा…“शिवसेना आमचीच दावा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो वगळला, हा त्यांचा अपमान नाही का ?” अजित पवारांचा सवाल