मुंबई : “राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे”, अशा आशायाची जाहिरात काल शिंदे गटाने सर्व वर्तमानपत्रात दिली होती. या जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटो टाकण्यात आलेला नव्हता तर शिंदेंना फडणवीसांपेक्षा वरचढ असल्याचं दाखवण्यात आलं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदेंवर टिका केली. यातच भाजपच्याही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यातच आता शिंदे गटाने आज पुन्हा वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे. त्यावरून आता शिंदेंवर टिकास्त्र सोडलं जात आहे.
हेही वाचा…राज्यात आज निवडणुका झाल्यास काय होणार ? सर्वात मोठा एक्झिट पोल आला पुढे, शिंदेंचं काय होणार?
शिंदेंच्या आजच्या सुधारित जाहिरातीत नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा फोटो देण्यात आला आहे. तसेच यात राज्यात भाजप-शिवसेनेला ४६.४ टक्के लोकांची पसंती तर डबल इंजिन सरकारमुळेच राज्याच्या विकासाला गती येत असल्याचे ६२ टक्के लोकांच मत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्रा माझा अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.
हेही वाचा…मोदींना जिंकवण्यासाठी भाजप ‘ह्या’ खासदारांचे तिकीट कापणार, बड्या नेत्याचं वक्तव्य
शिंदेंच्या सुधारीत जाहिरातीवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. “इजा कानाला झालेली नव्हती तर मनाला झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी. सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल ? असा सवालही करण्यात आला आहे. तर यामुळेचं राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. यांच्या काही नेत्यांना पदं मिळाली पण सामान्य नागरिक मात्र अडचणीत आलाय. सरकार केवळ जाहिरातीतच दिसत असल्याने बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचं का? असा सवालही रोहित पवारांनी सरकारला केला आहे”.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला छ.संभाजीनगरचे वावडे..! औरंगाबादचं नामांतराचा पडला विसर
दरम्यान, काल कोल्हापुर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. मात्र देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या कानाला इजा झाल्याने फडणवीसांना हवाई सफर करण्यास डॉक्टरांनी सांगितले नसल्याचं सांगण्यात आले, तर दुसऱ्या बाजूला शिंदेंच्या जाहिरातीमुळे फडणवीस नाराज असल्याची चर्चा काल राजकीय वर्तुळात रंगली होती.
इजा ‘कानाला’ झालेली नव्हती तर ‘मनाला’ झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी.
असो!
सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती.
त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल?… pic.twitter.com/fTj08TFJcg— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 14, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भाजपने इंजेक्शन टोचताच शिंदेंच्या शिवसेनेला उपरती, रात्रीत नेमकं काय घडलं, की चक्र फिरली
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी महेश लांडगे लागले कामाला..! ओझरमध्ये “श्री गणेशा”, सोबतीला भाजपची फौज
हेही वाचा…“महाराष्ट्रातच नाही तर या राज्यांतही मित्रपक्षांचं भाजपसोबत बिनसलं” मोदींना मोठा धक्का बसण्याची शक्यता
हेही वाचा…“कमी मार्काने पास झालो हे जाहिरातबाजीतून सांगणारा शिंदेंचा पहिलाच पक्ष”,सुप्रिया सुळेंनी उडवली शिंदेंची खिल्ली
हेही वाचा…“शिवसेना आमचीच दावा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो वगळला, हा त्यांचा अपमान नाही का ?” अजित पवारांचा सवाल