मुंबई : मागील काही दिवसापासून शासकीय रूग्णालयात होत असलेल्या रूग्णांच्या मृत्यूंवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. सध्या राज्यात रूग्णांचं मृत्यू होत असतांना जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. संकट आल्यावर मुख्यमंत्री कुठे आहेत. एक फुल दोन हाफ कुठे आहेत ? असा सवाल ठाकरेंनी राज्य सरकारला केला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…ठाकरेंची ‘ती’ चूक शरद पवार टाळणार, अन् निवडणुक आयोगाचा निकाल जिंकणार ? वाचा सविस्तर
कोविड काळात तोंडाला मास्क लावून फेसबूक लाईव्ह करत होते. तसेच एका बाजूला कोविड मध्ये माणसं मरत होते अन् हे घरात बसून नोटा मोजण्याचं काम करत होते. त्यांचा खरा चेहरा कोविड काळात लोकांनी पाहिलेला आहे. तसेच मागील काही वर्षापासून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे पैसे कुठे जात होते? हे सर्व बाहेर येणार आहे. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या घोटाळ्याची चौकशी मातोश्रीपर्यंत जाऊ शकते, याचं संकेत दिले आहेत.
हेही वाचा…बारामती अॅग्रोबाबत रोहित पवारांना हायकोर्टाचा पुन्हा दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे दिले आदेश
कोविड काळात घरात बसून काम करणाऱ्यांनी आम्हाला काही शिकवू नये. असं म्हणत ठाकरेंच्या एक फुल दोन हाफ टिकेला एक फुल एक हाफ यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. अस म्हणत शिंदेंनी पलटवार केला आहे. नांदेडच्या रूग्णालयात दोन मंत्री गेले होते, त्यांचे सचिवही गेले होते. त्या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी देखील लावली आहे. त्यासाठी माझ्यासह उपमुख्यमंत्री देखील लक्ष घालीत आहे. नांदेडचा झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. भविष्यात आयुक्तांच्या अधिकारा क्षेत्राखाली असलेल्या एका तरी रूग्णालयाची पाहणी केली पाहिजे. अशा प्रकराच्या सुचना काल देण्यात आल्या आहेत. औषधी खरेदीचे, मनुष्य बळ खरेदीचे अधिकाराचे जिल्ह्याध्यक्षांना दिले आहेत. तानाजी सावंत ऑनलाईनच्या माध्यमातून बैठका घेत आहेत. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…पाय मुरगळला, इंजेक्शन दिलं अन् रूग्ण दगावला, सरकारच्या आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार थांबता थांबेना
हेही वाचा…अजित पवारांच्या ‘त्या’ प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं टाळलं, पण ठाकरेंवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“एका मस्तवाल गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले अन्..,” ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…शिंदे अन् अजित पवार गटातले नेते भिडले, अन् अधिकाऱ्यांनी एका वाक्यात विषय संपवला
हेही वाचा…“संकट आल्यावर एक फुल दोन हाफ कुठे गेले ?” उद्धव ठाकरे राज्य सरकारवर संतापले