पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांना रात्री बारा वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. यातच राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. यातच आता रोहित पवारांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे.
हेही वाचा…“१२ वर्षानंतर मुलं झालं, अन् तेही गेलं हो..,”सुळेंसमोरच माय धायमोकलून रडली, व्हिडीओ प्रचंड व्हायरल
बारामती अॅग्रोबाबत रोहित पवारांना या अगोदर मोठा दिलासा दिला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियमंत्रण मंडळाने ६ ऑक्टोंबर पर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला होता. यातच आता बारामती अॅग्रोबाबत १६ अक्टोंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचं पुन्हा हायकोर्टाने सांगितलं असून याबाबत भूमिका मांडण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे.
हेही वाचा…शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच! भाजपचा शरद पवारांना चिमटा
दरम्यान, बारामती अॅग्रो कंपनीचे सीईओ म्हणून रोहित पवार काम पाहत आहेत. तर रोहित पवारांचे वडिल या कंपनीचे संचालक आहेत. पशू खाद्य बारामती अॅग्रोचं मुख्य प्रोडक्ट असून साखर उत्पादनही सुरू करण्यात आलं आहे. याच्या बारामती आणि छत्रपती संभाजीनगर या दोन ठिकाणी साखर कारखाने आहेत. दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसायही बारामती अॅग्रोद्वारे केले जातात. दरम्यान, महाराष्ट्र नियंत्रण मंडळाची नोटीस दोन मंत्र्यामुळे आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर तुमच्या कानाजवळ डी.जे वाजवल्याशिवाय राहणार नाही,” सुषमा अंधारेंना ‘कोणी’ दिला इशारा
हेही वाचा…वडिलांवरील टिका श्रीकांत शिंदेंच्या जिव्हारी लागली, अन् आजी माझी मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये वाकृयुद्ध रंगलं
हेही वाचा…“हजारे-आव्हाड वाद टोकाला,” अण्णा हजारे आव्हाडांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
हेही वाचा…भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रवादीमधून आलेला ‘हा’ नेता नकोसा झालाय, “पुन्हा उमेदवारी दिली तर..,” निष्ठावंत आक्रमक
हेही वाचा…शिंदेंच्या बाजूने यंत्रणा उभी? कोर्टात नेमकं काय घडतयं, सुनावणी थेट एक महिन्यानंतर