सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ मतदारसंघात विजय मिळवण्याचे उद्दिष्टे ठेऊन भाजपने महाविजय यात्रा सुरू केली आहे. त्यात गुरूवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगलीचा दौरा केला, मात्र यावेळी भाजपमधील संघप्रणीत निष्ठावंत आणि नव्याने दाखल झालेल्यांतील संघर्ष उफाळून आला. त्यामुळे मनपा क्षेत्रातील दौरा गुंडाळून बावनकुळे तासगावकडे रवाना झाले.
हेही वाचा…मोठी बातमी..! राऊतांच्या धाकट्या भावाला नोटीस, ‘या’ प्रकरणाबाबत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
राष्ट्रवादीतून आयात केलेल्या संजय पाटील यांना दोन वेळा खासदारपदासाठी संधी दिली. आता २०२४ मध्ये त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, अशा शब्दांत भाजपनिष्ठावंतांनी बावनकुळेंनी सुनावले. केंद्रात आणि राज्यात भाजपला २०१४ मध्ये सत्ता प्राप्त करून देण्यासाठी ज्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले, त्यांना सत्तेत सहभागी न करता उपरे आलेल्यांना सत्तेची संधी सातत्याने दिली गेली. अशी तक्रार जुन्या कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून भाजपात आलेल्या संजय पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा…“सत्तेच्या डोहात बुडालेल्या सरकारच्या डोक्यात माज भरला, अन् कोर्टात पराभव झाला”
सत्ता उपभोगलेल्यांना आता पक्षसंघनेत सक्रिय केले जावे आणि निष्ठावंतांना संधी मिळावी, असा आग्रह संघप्रणीत कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांच्याकडे केली. हिंदुत्वाचा विजयरथ रोखण्यासाठी तथाकथित समाजवादी व डाव्या पक्षांनी ‘इंडिया आघाडी’ स्थापन केली. पण पंतप्रधानपदाचा उमेदवार त्यांना जाहीर करताआला नाही. हीआघाडी हिंदू संस्कृती संपवण्याचे काम करणार आहे. हे जनतेला कदापिही मान्य होणार नाही. असं बावनकुळेंनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंच्या बाजूने यंत्रणा उभी? कोर्टात नेमकं काय घडतयं, सुनावणी थेट एक महिन्यानंतर
हेही वाचा…“१२ वर्षानंतर मुलं झालं, अन् तेही गेलं हो..,”सुळेंसमोरच माय धायमोकलून रडली, व्हिडीओ प्रचंड व्हायरल
हेही वाचा…शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच! भाजपचा शरद पवारांना चिमटा
हेही वाचा…“विमान प्रवास 44 लाख, हॉटेलसाठी 2 कोटी 40 लाख, जेवणासाठी 1 कोटी,” ठाकरेंच्या दाओस दौऱ्याचा सामंतांनी मांडला हिशोब
हेही वाचा…निवडणुक आली की गाजर दाखविण्याचं काम, मोदींजी देशातील जनता तुम्हाला विटलीय