सांगली : शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ठेवण्यासाठी व आपले लोक बांधून ठेवायचे आहेत, असा चिमटा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला. ते सांगली लोकसभा प्रवासात कराड येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. महायुतीमध्ये भाजपा हा मोठा भाऊ आहे. कुटुंब किंवा आघाडीमध्ये मोठ्या भावाने एक पाऊल मागे घेणे ही पूर्वीपासून भाजपाची भूमिका आहे, त्यात वावगे काहीच नाही. असंही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“निकाल काही असो, चिंता करण्याची काही गरज नाही”, निकालाआधी शरद पवारांनी शड्डू ठोकला
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार शक्य
सरकारमध्ये असणाऱ्या लोकप्रतिनिधींची कामे आता होत आहेत. लवकरच राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, असे झाले तर १४-१५ मंत्री वाढतील आणि पालकमंत्री देखील वाढतील, सरकारी कामे व योजनांना गती मिळेल. असंही बावनकुळेंनी म्हटलयं.
योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी नियुक्ती
बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्यांना साईड पोस्टिंग दिली, त्यांच्यावर खटले भरण्या आले. त्यापेक्षा महायुती सरकारने कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना योग्य ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये क्लिनचिट मिळाली आहे, त्या कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.धार्मिक स्थळांविषयी बोलणे चुकीचेच! धार्मिक स्थळे मंदिर, मशीद किंवा बौद्ध विहारांना लष्कराच्या ताब्यात देणे चुकीचे आहे. सर्वांच्या धार्मिक भावना वेगळ्या आहेत, अधिष्ठान वेगळे आहे. त्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी बोलणे योग्य नाही.
हेही वाचा…गावभर होर्डिंग्ज लावणं भोवलं, पुनीत बालन यांना पालिकेचा दणका,सन्मानार्थ मंडळाचे कार्यकर्ते एकवटले
मोदी-मोदींचा जयघोष; कार्यकर्त्यांशी संवाद
बावनकुळेंनी प्रवासात तासगाव येथे तासगाव-कवठे महांकाळ, जत व खानापूर आणि दुपारी मिरज येथे मिरज, सांगली व पलूस-कडेगाव या विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी संवाद साधला. सुपर वॉरिअर्सच्या मेहनतीतून पुन्हा एकदा सांगलीचा खासदार पंतप्रधान मोदींच्या समर्थनात उभा राहील असा विश्वास व्यक्त केला. तासगाव येथे गणपती मंदिर ते बागणे चौकपर्यंत आणि मिरज येथे ते ‘घर चलो अभियानात सहभागी झाले. त्यांनी व्यापारी व छोट्या विक्रेत्यांशी संवाद साधला. पुढचा पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारताच सर्वांनी मोदी-मोदीचा जयघोष केला. या प्रवासात त्यांनी ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ नारायण म्हात्रे, अक्षय वाघमारे यांच्याशी स्नेह भेट घेतली व मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.
READ ALSO :
हेही वाचा…“विमान प्रवास 44 लाख, हॉटेलसाठी 2 कोटी 40 लाख, जेवणासाठी 1 कोटी,” ठाकरेंच्या दाओस दौऱ्याचा सामंतांनी मांडला हिशोब
हेही वाचा…निवडणुक आली की गाजर दाखविण्याचं काम, मोदींजी देशातील जनता तुम्हाला विटलीय
हेही वाचा…मोठी बातमी..! राऊतांच्या धाकट्या भावाला नोटीस, ‘या’ प्रकरणाबाबत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
हेही वाचा…“सत्तेच्या डोहात बुडालेल्या सरकारच्या डोक्यात माज भरला, अन् कोर्टात पराभव झाला”
हेही वाचा…“वैद्यकीय मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या,’ काॅंग्रेसच्या शिष्ठमंडळाची राज्यपालांकडे मागणी