मुंबई : मागील काही दिवसापासून शासकीय रूग्णालयात होत असलेल्या रूग्णांच्या मृत्यूंवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. सध्या राज्यात रूग्णांचं मृत्यू होत असतांना जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. संकट आल्यावर मुख्यमंत्री कुठे आहेत. एक फुल दोन हाफ कुठे आहेत ? असा सवाल ठाकरेंनी राज्य सरकारला केला आहे.
हेही वाचा…भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रवादीमधून आलेला ‘हा’ नेता नकोसा झालाय, “पुन्हा उमेदवारी दिली तर..,” निष्ठावंत आक्रमक
रूग्णालयात जे बळी गेले आहेत, त्यासाठी मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहे की त्याठिकाणी जाऊन पाहणी करावी, परंतु मुख्यमंत्री सध्या दिल्लीत बसले आहेत. असं म्हणत असतांना नांदेडच्या डीनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का केला ? फक्त मिंधे सरकारमधील एका खासदारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर डीनवर गुन्हा दाखल झाला. मग इतर शासकीय रूग्णालयात मृत्यू झालेत तिथल्या डीनवर का गुन्हा दाखल केले नाहीत. ? असा सवालही ठाकरेंनी केलाय.
हेही वाचा…शिंदेंच्या बाजूने यंत्रणा उभी? कोर्टात नेमकं काय घडतयं, सुनावणी थेट एक महिन्यानंतर
दरम्यान, जाहिराती करायला पैसे आहेत,परंतु राज्यातील रूग्णांचे जीव वाचवायला पैसे नाहीत. आता सध्या भ्रष्टाचाराची साथ असून आरोग्य विभागात रेट कार्ड पाठवले जात आहेत. औषध पोहोचली नाही तिथे कुणाचे दलाल बसले आहेक का ? धरण फुटले ते खेकड्यामुळे असे काही खेकडे बसले आहेत का ? असा सवाल करत कोरोळा काळात हेच डॉक्टर होते, ह्याच नर्स होते, हीच यंत्रणा होती, तरी उपचार नसताना देखील रूग्णांची काळजी घेतली गेली. योद्धा सारखे ते लढले, त्यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप ठाकरेंनी राज्य सरकावर लावला..
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंची ‘ती’ चूक शरद पवार टाळणार, अन् निवडणुक आयोगाचा निकाल जिंकणार ? वाचा सविस्तर
हेही वाचा…बारामती अॅग्रोबाबत रोहित पवारांना हायकोर्टाचा पुन्हा दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे दिले आदेश
हेही वाचा…“तर तुमच्या कानाजवळ डी.जे वाजवल्याशिवाय राहणार नाही,” सुषमा अंधारेंना ‘कोणी’ दिला इशारा
हेही वाचा…वडिलांवरील टिका श्रीकांत शिंदेंच्या जिव्हारी लागली, अन् आजी माझी मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये वाकृयुद्ध रंगलं
हेही वाचा…“हजारे-आव्हाड वाद टोकाला,” अण्णा हजारे आव्हाडांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार