अमरावती : कृषी मंत्री अब्दुल सत्तार सध्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. या दौऱ्यात सत्तारांनी नुकतंच केलेलं एक वक्तव्य खूप गाजतंय. मेळघाटमधील प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्याशी बोलताना सत्तारांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला आहे.
अन् चंद्रकांत पाटील अडकले गर्दीत, मोटारसायकलवरून पुण्यात केला प्रवास
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केला. या बंडात 10 अपक्ष आमदार होते. यात आमदार बच्चू कडू यांनीही शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी गुवाहटीला गेले होते. मात्र त्यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. यावरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘ये मीठा है और कडू है’..असा टोला आमदार बच्चू कडू यांना लगावला आहे.
“मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं
आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतात. ते पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात नक्की आमचा विचार करतील. असं आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. मात्र मंत्री सत्तारांच्या टिप्पणीवर बच्चू कडू काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष असाणार आहे.
“55 पैकी 40 आमदार व 18 पैकी 12 खासदार, त्यामुळे दसरा मेळावा आम्हीच घेणार”; शंभुराज देसाई
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिवेशनाच्या वेळी एक दिवस राज्यातील शेतकऱ्यांसोबत घालवणार असल्याचं सांगितलं आहे. सत्तार हे आत्ता मेळघाट याठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या वेळी त्यांनी चुन्नीलाल पटेल यांच्या घरी पाहुणचार घेतला. त्यांनी रानभाजी आणि भाकरीचे जेवण शेतकऱ्यांसोबत केले आहे.
Read also
- “शेतकऱ्यांवर चांगले दिवस येऊ देत”; नवनीत राणांचे गणरायाकडे साकडं
- “येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा”; शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
- “उद्धव ठाकरे साधा सरपंच देखील होण्याच्या लायकीचा माणूस नाही”; राणेंची जहरी टिका
- “मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं
- अन् चंद्रकांत पाटील अडकले गर्दीत, मोटारसायकलवरून पुण्यात केला प्रवास