मुंबई : थेट सरकारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी भरतीच्या कक्षा आणखी रूंदावल्या आहेत. अधिकाऱ्यासह सर्व कार्यालयातील सरकारी पदं आता कंत्राटी असणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राजकीय नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या संदर्भात राज्य सरकारने आठ कंपन्याना ठेका दिल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता राज्य सरकारवर जोरदार टिका केली जात आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“सगळ्यातून सरकार बोध घेईल अन् चॅनल्सचे माईक..,” राज ठाकरेंचा सरकारला खोचक टोला
कंत्राटी भरतीचा मुद्या ऐरणीवर आला असतांना अजित पवार यांचं मागील विधान चर्चेचे ठरले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च प्रचंड असून एका कर्माचाऱ्याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन तीन कर्मचारी काम करू शकतात. राज्याचे वार्षिक बजेट साडेपाच ते सहा लाख कोटींचे असून यापैकी २ लाख ४० हजार कोटींचा खर्च केवळ वेतनावर खर्च होतो. असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर अजित पवार यांच्यावर जोरदार टिका करण्यात येत आहे.
हेही वाचा…“शेतकऱ्यांची योजना अन् ‘या’ भाजप मंत्र्यांची मुलगी योजनांची लाभार्थी, काॅंग्रेसचा हल्लाबोल
दरम्यान, अजित पवारांनी देखील यावर भाष्य केलं आहे. कारण नसतांना मला ट्रोल करायचं काम चालू आहे. काम मी दिवसभर मंत्रालयात होतो. एक लाख ५० हजार मुलामुलींची भरती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात चालू आहे. आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि काहीही व्हॉट्रसअॅप व सोशल मीडियावर वेगळ्या बातम्या पसरवतात. असं अजित पवारांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…विलासराव देशमुख, चव्हाण, फडणवीस या मुख्यमंत्र्यांची परंपरा शिंदे मोडीत काढणार, तब्बल ३२ हजार रूपये…,
हेही वाचा…“घराणेशाहीतून भाजप झालीय भ्रष्टाचारी” भाजप मंत्र्यांच्या मुलीने लुटला १० कोटींचा निधी, राष्ट्रवादीची जोरदार टिका
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारत उभारणीला ‘गती’, पहिल्या टप्प्यात ४ मजली इमारत उभारणार : आमदार लांडगे
हेही वाचा…“निवडणुका जवळ आल्या, राम मंदिराची सुरक्षा वाढवा,” प्रकाश आंबेडकरांची मागणी
हेही वाचा…शिवसेना प्रकरणात ४१ याचिका दाखल, पुढील सुनावणी कधी ? अध्यक्षांनी सांगितल्या तारखा