अमरावती : वंचित बहुजन आघाडीकडे माहिती आहे की, हिंदू समाजाची जी प्रार्थनास्थळे आहेत,त्याठिकाणी निवडणुकीच्या आधी गडबड होऊ शकते. यावरून देशातील वातावर बिघडवले जाऊ शकते. त्यामुळे ह्या सर्व प्रार्थना स्थळांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आर्मीकडे द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
हेही वाचा…“आरएसएसची पुण्यात बैठक, तीन शाळांना सुट्टी,” मुलांचे शैक्षणिक नुकसान कशासाठी? राष्ट्रवादीचा सवाल
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. हिंदू धर्मियांच्या जिव्हाळ्याचे जी मंदिरे आहेत. त्यातील ज्ञानवापी, अयोध्या राम मंदिर, मथूरा शाही इदगाह, जम्मू काश्मिरमधील मॉं वैष्णवदेवी मंदिर दिल्लीमधीलल स्वामीनारायण अक्षरधाम हे मंदिर टार्गेट केली जाऊ शकतात. अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“दिलेला शब्द खरा ठरावा, नाहीतर गाठ मराठ्यांशी”, राष्ट्रवादीने एकनाथ शिंदेंना दिला इशारा
लोकांच्या श्रद्धेला ठेच पोहचून देशातील वातावरण कलुषित करण्याचा डाव आहे. आतापर्यंत पोलिसांच्या कारवाईबद्दल जनतेला शंका आहे, त्यामुळे सैन्य किंवा राष्ट्रीय सुरक्षा दलकडे या सर्व ठिकाणाची जबाबदारी द्या. ज्यामुळे लोकांच्या भावनेला धक्का लागणार नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे. गेल्या नऊ वर्षामध्ये एखादं मुस्लिम, दलित आणि आदिवासी कुटुंब पकडून त्याची हत्या करून दहशत निर्माण करायची. ही परिस्थिती बदललेली नाही आहे. भाजप-आरएसएसचे राजकारण धर्माचे राहिलेलं आहे. बदलाचे राजकारण कुठेही नाही असा घणाघात देखील त्यांनी चढवला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना प्रकरणात ४१ याचिका दाखल, पुढील सुनावणी कधी ? अध्यक्षांनी सांगितल्या तारखा
हेही वाचा…“सगळ्यातून सरकार बोध घेईल अन् चॅनल्सचे माईक..,” राज ठाकरेंचा सरकारला खोचक टोला
हेही वाचा…“शेतकऱ्यांची योजना अन् ‘या’ भाजप मंत्र्यांची मुलगी योजनांची लाभार्थी, काॅंग्रेसचा हल्लाबोल
हेही वाचा…“सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा नारायण राणेंचा विरोध, म्हणाले..,”
हेही वाचा…अजित पवारांचा फोटो पाहून सुप्रिया सुळे झाल्या भावूक, गुप्तेंच्या कार्यक्रमात सुळेंनी लावली हजेरी