मुंबई : मराठा आरक्षणासाठी सतरा दिवस उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी १२ सप्टेंबर ते १२ ऑक्टोंबर असे ३० दिवस आणि मनोज जरांगे यांनी दिलेले वाढीव १० दिवस असा ४० दिवसाचा वेळ दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…ठाकरे गटावर ‘शिंदे गट’ भारी पडणार, शिंदे गटाकडून ‘हा’ बडा वकिल युक्तिवाद करणार
मराठ्यांना आरक्षण देण्याची निजामाच्या काळात पद्धत होती. त्याची कागदपत्रे मराठवाड्यात अजूनही आहेत. सरसकट मराठ्यांना कुणबी दाखला देऊ नये. कुणबी दाखले द्यावेत अशी ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही, गरीब, गरजू मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. तसेच यापूर्वी मराठा समाजातील मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देताना हात आखडता घेतला नाही. त्यामुळे इतरांनी पण आता मराठा समाजाला पाठिंबा देण्याची मागणीही त्यांनी केलीय.
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकेवर सुनावणी सुरू, विधिमंडळाच्या सभागृहात शिंदे अन् ठाकरे गटात होणार वाकृयुद्ध ?
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सतरा दिवस उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी 12 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर असे 30 दिवस आणि मनोज जरांगे यांनी दिलेले वाढीव 10 दिवस असा 40 दिवसाचा वेळ दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांचा फोटो पाहून सुप्रिया सुळे झाल्या भावूक, गुप्तेंच्या कार्यक्रमात सुळेंनी लावली हजेरी
हेही वाचा…“आरएसएसची पुण्यात बैठक, तीन शाळांना सुट्टी,” मुलांचे शैक्षणिक नुकसान कशासाठी? राष्ट्रवादीचा सवाल
हेही वाचा…“दिलेला शब्द खरा ठरावा, नाहीतर गाठ मराठ्यांशी”, राष्ट्रवादीने एकनाथ शिंदेंना दिला इशारा
हेही वाचा…“तब्बल १७ दिवसानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले”, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “यापुढे आम्ही..,”
हेही वाचा…संसदेच्या विशेष अधिवेशात ‘या’ विधेयकावर होणार चर्चा, 17 सप्टेंबर बोलवली सर्वपक्षीय बैठक, हालचाली सुरू