जालना : मराठा समाज आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युस पाजून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल १७ दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक नेते अंतरवाली सराटी गावात दाखल झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा विश्वास व्यक्त केला. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…मनोज जरांग्यांचं उपोषण मागे, एकनाथ शिंदेंनी जरांग्यांना कोणतं आश्वासन दिलं ?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे. मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही. मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे. भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल. असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…धाडसी निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये क्षमता, “मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही,” मनोज जरांगे पाटील
दरम्यान, मागच्या सरकारने देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं. परंतु मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टात टिकलं नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारचीही भूमिका आहे. लाठीचार्जमध्ये गावकऱ्यांवरचे सर्व गुन्हे मागे घेणार आहे. याचसोबत कोणावरही अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण देणार आहे. लाठीचार्जमधील दोषींचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. एकनाथ शिंदेसुद्धा गरीब कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता आहे. माझ्या पोटात एक ओठावर एक असं नाही. रद्द झालेलं आरक्षण मराठा समाजाला देण्याची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे.
मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2023
READ ALSO :
हेही वाचा…संसदेच्या विशेष अधिवेशात ‘या’ विधेयकावर होणार चर्चा, 17 सप्टेंबर बोलवली सर्वपक्षीय बैठक, हालचाली सुरू
हेही वाचा…ठाकरे गटावर ‘शिंदे गट’ भारी पडणार, शिंदे गटाकडून ‘हा’ बडा वकिल युक्तिवाद करणार
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकेवर सुनावणी सुरू, विधिमंडळाच्या सभागृहात शिंदे अन् ठाकरे गटात होणार वाकृयुद्ध ?
हेही वाचा…पुण्यात शिंदेंना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या ‘या’ कट्टर समर्थकाने दिला आपल्या पदाचा राजीनामा
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय”, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल