मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आज विधिमंडळात शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकेवर सुनावणी होत आहे. आज ठाकेर गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाकडून वकिल असीम सरोदे आणि देवदत्त कामत आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…वाद आणखी चिघळला..! राणांच्या विरोधात यशोमती ठाकूर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार
विधिमंडळात आज ठाकरे गटाकडून गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड बेकायदेशीर असून मग गट नेता कायदेशीर कसा ? असा युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती सुप्रिम कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे. कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असाही युक्तिवाद होऊ शकतो.
हेही वाचा…४८ मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी, निवडणुकीपुर्वीच भाजपचा आराखडा तयार
पक्ष चिन्हाबाबत आयोगाच्या निकालावर कोर्टात सुनावणी सुरू असल्यानं ही बाब विचारात घेऊ नये, अपात्रतेचं प्रकरण सुप्रिम कोर्टात जाण्याआधी विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस काढली होती, गटनेता आणि व्हिप आमचा आहे, त्यामुळे विधिमंडळ पक्ष म्हणून आम्हाला विचारात घ्यावं, त्यामुळे पक्षाच्या व्हिपचं उल्लंघन केल्यानं शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करा, अशी मागणी ठाकरे गटाकडून होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…फडणवीसांवर टिका, भाजप आक्रमक, शिंदे गटाच्या नेत्या म्हणाल्या “उद्धव ठाकरेंनीही तसं करावं”
दुसऱ्या बाजूला विधिमंडळात संख्याबळ आमच्याकडेच असून एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते तसेच संपुर्ण पक्षच त्यांच्या बाजूने आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुखच आमदारांचंं ऐकून घेत नव्हते, पक्षाच्या विचारधारेविरोधात सगळं सुरू होतं. आम्ही कोणतीही पक्षविरोधी कारवाई केली नाही. बहुमत आणि एकमतानं जुन्या मित्रपक्षासोबत गेलो. एकनाथ शिंदे गटनेते असून त्यांची विधानसभेतील बहुमताच्या आधारे निवड करण्यात आली आहे. असा युक्तिवाद शिंदे गटाकडून केला जाण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात शिंदेंना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या ‘या’ कट्टर समर्थकाने दिला आपल्या पदाचा राजीनामा
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय”, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…मनोज जरांग्यांचं उपोषण मागे, एकनाथ शिंदेंनी जरांग्यांना कोणतं आश्वासन दिलं ?
हेही वाचा…धाडसी निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये क्षमता, “मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही,” मनोज जरांगे पाटील
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलाचं उपोषण सुटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांग्यांना ज्युस पाजलं