मुंबई : कर्नाटकमधील काँग्रेस सरकार आज १९५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार आहे. इकडे महाराष्ट्रात मात्र सरकार बेधुंद वागतंय. शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. कर्जाचे पुनर्गठन सरकारने केलेले नाही. मग, महाराष्ट्र सरकार काय करतंय ? जनतेच सरकार म्हणून थापा मारणारे मुख्यमंत्री निष्क्रिय बसून आहे. अशी टिका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा…फडणवीसांवर टिका, भाजप आक्रमक, शिंदे गटाच्या नेत्या म्हणाल्या “उद्धव ठाकरेंनीही तसं करावं”
दरम्यान, अर्धे उपमुख्यमंत्री नुकतेच जपान फिरून आले आणि आता राजस्थान निवडणूक प्रचारात व्यस्त आहे. अर्धे उपमुख्यमंत्री त्यांच्या अखत्यारीत न येणाऱ्या खात्यांच्या बैठका घेऊन स्वतःच्या आमदारांसाठी निधी पळवण्यात व्यस्त आहे. दुष्काळाने शेतकरी होरपळतोय त्याच्याकडे सरकारचं लक्ष कधी जाणार? सत्तेत बसून स्वतःची कामे करून घेण्याच्या नादात या सरकारने शेतकऱ्यांचा डब्बा आता सोडला असे चित्र स्पष्ट दिसत आहे. अशी टिका देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंशी पंगा, यशोमती ठाकूरांसोबत वाद, नवनीत राणांचा संघर्ष अटळ”
दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटलांना ज्यूस पाजून उपोषण मागे घेण्यास विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी तब्बल १७ दिवसापासून सुरू असलेलं उपोषण मागे घेतलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आज ठाकरे गटाच्या आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर होत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मनोज जरांग्यांचं उपोषण मागे, एकनाथ शिंदेंनी जरांग्यांना कोणतं आश्वासन दिलं ?
हेही वाचा…धाडसी निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये क्षमता, “मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही,” मनोज जरांगे पाटील
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलाचं उपोषण सुटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांग्यांना ज्युस पाजलं
हेही वाचा…वाद आणखी चिघळला..! राणांच्या विरोधात यशोमती ठाकूर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार
हेही वाचा…४८ मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी, निवडणुकीपुर्वीच भाजपचा आराखडा तयार