जालना : मराठा समाज आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युस पाजून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल १७ दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक नेते अंतरवाली सराटी गावात दाखल झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला आहे.
हेही वाचा…“खाजगी आयुष्यातलं मी..,” नितेश राणेंना इन्फ्लूएंझा व्हायरस डिटेक्ट झाला, काळजी घेण्याचं केलं आवाहन
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आपलं उपोषण मागे घेतलं आहे. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणात स्वत:हून लक्ष घातलं आहे. धाडसी निर्णय घेण्यासी क्षमता एकनाथ शिंदेंमध्ये आहे. आता मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आणखी १० दिवसांचा वेळ वाढवून दिला आहे आणि आणखीन वेळ वाढवून देईल पण आरक्षण घेतल्याशिवाय काही राहणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा…“राज्यातील शेती तोट्यात, निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली,” सरकार दुष्काळ का जाहीर करीत नाही?
दरम्यान, मागील काही सरकारमध्ये मराठा समाजाला १७ ते १८ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पंरतु ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. आता नव्याने मराठा आरक्षणासाठी समित्या नेमल्या आहेत. त्यांचा अहवाल येणारच आहे. यातच मागील काही वर्षात अतिशय शांततेच मराठा समाजाचे मोर्चे निघालेत. परंतु त्याला काही गालबोट लागले नाहीत. परंतु याठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडली. आरक्षणावर काम सुरू आहे. त्यामुळे तुम्ही निवांत राहा. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलाचं उपोषण सुटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांग्यांना ज्युस पाजलं
हेही वाचा…वाद आणखी चिघळला..! राणांच्या विरोधात यशोमती ठाकूर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार
हेही वाचा…४८ मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी, निवडणुकीपुर्वीच भाजपचा आराखडा तयार
हेही वाचा…फडणवीसांवर टिका, भाजप आक्रमक, शिंदे गटाच्या नेत्या म्हणाल्या “उद्धव ठाकरेंनीही तसं करावं”
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंशी पंगा, यशोमती ठाकूरांसोबत वाद, नवनीत राणांचा संघर्ष अटळ”