पुणे : लोकांची माथी भडकवण्याची काम करणाऱ्या संभाजी भिडे यांना इतकी वर्षे मराठा आरक्षणाचा मुद्दा दिसला नाही का? त्यांना याबद्दल बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. शासनाचे प्रतिनिधी म्हणून ते त्या ठिकाणी गेले असावेत असा संशय आहे. शासनाने मनोज जरांगे यांच्याकडे एक महिन्याची मुदत मागितली आहे. मराठ्यांना एक महिन्याच्या आत कश्याप्रकारे आरक्षण दिलं जाणार आहे? याचा रोड मॅप शासनाने जाहीर करावा. अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली आहे.
हेही वाचा…आघाडीत बिघाडी…! रावेत लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसमध्ये जुंपली
मराठ्यांची दिशाभूल करण्याचा हा सर्व प्रकार सुरू आहे. फडणवीस ज्यावेळेला म्हणत आहेत की एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडली नव्हती. तर त्यांनी कोणती बाजू मांडली नव्हती व कोणते मुद्दे मांडले नव्हते याचा खुलासा सरकारने द्यायला हवा. ५० टक्के मर्यादा काढल्याशिवाय ओबीसी व मराठा या दोघांचंही समाधान होणार नाही. राज्यातील शेती तोट्यात गेली आहे. खरीपाची पिके वाया गेलेली आहेत. निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली असताना सरकारने अद्यापपर्यंत दुष्काळ जाहीर केलेला नाही. शासनाकडून विमा कंपन्यांना पैसे दिले गेले नसल्यामुळे पिक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळत नाही. दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाचे कुठलेही नियोजन झालेले दिसत नाही. असे असताना ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी व जाहिरातबाजीसाठी राज्य शासन कोट्यावधी रुपये खर्च करताना दिसत आहे. असंही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“राज्यात आरक्षण समाप्ती ? मागारवर्गीय जागे व्हा..!” जितेंद्र आव्हाडांचं मोठं आवाहन
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, शासनामधील रिक्त जागा या कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. या जागा भरण्यासाठी एकूण ०९ कंपन्यांची सरकारने निवड केलेली आहे. कंत्राटी पद्धतीने जर सर्व जागा भरल्या जात असतील तर आरक्षणाचा काय फायदा? असा प्रश्न राज्यभरातील बेरोजगारांना पडलेला आहे. एका शासकीय कर्मचाऱ्याच्या वेतनाच्या खर्चात तीन खाजगी कर्मचारी काम करू शकतात हे अजितदादांचे वक्तव्य बेरोजगारांची दिशाभूल करणारे आहे. खर्च परवडणार नाही असं सांगणं म्हणजे नोकरशाहीवर अविश्वास दाखवण्याचा प्रकार आहे. याचा अर्थ प्रशासन सक्षम करण्यासाठी शासनाने कोणतीही मोहीम आखलेली दिसत नाही. शासनसुद्धा खाजगी कंपनीला चालवायला द्यायचं का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“संभाजी भिडे उपोषणाच्या ठिकाणांहून अजित पवारांच्या काळजात घुसून आले”
हेही वाचा…अजित पवारांनी पुण्यासाठी स्पेशल घेतली मॅरेथॉन बैठक, आगामी निवडणुकीसाठी खास तयारी
हेही वाचा…व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओबाबत शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले, “त्यावेळीचा माईकवरील संवाद हा…,”
हेही वाचा…“अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे ‘नाकर्ते सरकार’ राज्याचा कारभार हाकताहेत”
हेही वाचा…“रोहित पवारांची अजित पवारांवर टिका,” अजित पवारांचा ‘हा’ भिडू थेट रोहित पवारांशी भिडला