पुणे :- थेट सरकारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी भरतीच्या कक्षा आणखी रूंदावल्या आहेत. अधिकाऱ्यासह सर्व कार्यालयातील सरकारी पदं आता कंत्राटी असणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राजकीय नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या संदर्भात राज्य सरकारने आठ कंपन्याना ठेका दिल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांना बाप म्हणणारे आता मोदींना बाप समजतात”, काॅंग्रेसच्या आमदारानी रवी राणांना दाखवला कात्रजचा घाट
राज्यात एका बाजूला आरक्षणासाठई लढाई सुरू असताना, दुसरीकडे राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकरी भरती करण्यासाठी ९ खासगी कंपन्यांना कंत्राट दिले आहे, पण या हजारो पदांच्या जागांसाठी कोणतेही आरक्षण ठेवलेले नाही. याबद्दल कोणताच राजकीय पक्ष अद्याप भूमिका घेतांना दिसत नाही. या नोकऱ्यांतही विहित आरक्षण दिलेच पाहिजे. नाही तर हे आरक्षण समाप्तीच्या पाऊल ठरेल. मागारवर्गीय जागे व्हा. असंही आव्हाडांनी आवाहन केलं आहे.
हेही वाचा…“पैशाच्या जोरावर राजकीय पक्ष फोडणं भाजपचं काम,” बाळासाहेब थोरतांची भाजपवर जोरदार टिका
दरम्यान, राज्य सरकारने 9 खासगी कंपन्यांकडून इंजिनिअर, व्यवस्थापक, संशोधक, अधीक्षक सारख्या 150 हुन अधिक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हजारोंच्या या भरतीचे संपूर्ण अधिकार या कंपन्यांना दिलेत, त्यातील काही कंपन्या या परराज्यातील आहेत. वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत करून सरकारी नोकरी मिळवण्याच्या सर्वसामान्य तरूणांच्या आशा धुळीला मिळवण्याचा हा निर्णय आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज्यात आरक्षण समाप्ती ?.
राज्यात एका बाजूला आरक्षणासाठी लढाई सुरु असताना, दुसरीकडे राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती करण्यासाठी ९ खासगी कंपन्यांना कंत्राट दिले आहे. पण या हजारो पदांच्या जागांसाठी कोणतेही आरक्षण ठेवलेले नाही. याबद्दल कोणताच राजकीय पक्ष अद्याप…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“आरक्षण देण्याची दानत नसेल तर सांगा पण..,” शिंदेंच्या ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, ठाकरे गटाची टिका
हेही वाचा…“सरकारी कर्मचाऱ्यांच्या भरत्या आता कंत्राटी पद्धतीने,” खासदार अमोल कोल्हे सरकारवर भडकले
हेही वाचा…“धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे फडणवीस आता का आरक्षण देत नाहीत ?”
हेही वाचा…महायुतीतल समन्वय समितीची बैठकीत मोठा निर्णय, महाविकास आघाडीविरूद्ध रणशिंग फुंकलं
हेही वाचा…निवडणुकांसाठी ठाकरेंचा मेगा प्लॅन, ‘होऊ दे चर्चा’च्या उपक्रमातून मोदींवर हल्लाबोल, पहिलाच कार्यक्रम बारामतीत