अहमदनगर : कोराना काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते. परंतु त्यानंतर राज्यात नवीन सरकार आलं. ते कसं आलं ते सांगण्याची गरज नाही. कारण त्यावेळी बैलांच्या अंगावर देखील ५० खोके एकदम ओक्केचा उल्लेख करण्यात आला. राज्याराज्यात चांगलं सरकार पाडायचं , आमदारांना फोडायचं, त्यातून सरकार बनवायचं असं काम भाजप करत असल्याची टिका काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
हेही वाचा..“सरकार आपल्यासमोर झुकले”, मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार?
आता महायुतीत अजित पवार सामील झाले आहेत. ते कसे सामील झाले आहेत ते वेगळं सांगण्याची गरज नाही. भाजप पैशाच्या जोरावर राजकीय पक्ष फोडणं आणि लोकशाही पद्धतीने चालेली व्यवस्था तोडणं हेच काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश एकदा गोव्यातही हेच केलं होतं. त्यामुळे हे सामान्य जनतेला हे बिलकूल मान्य नाही. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार निश्चितपणे येईल. ही खात्री आहे. असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.
हेही वाचा…“शिवकार्यात शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून..,”अमोल कोल्हेंनी शरद सोनवणे यांना दिला पाठिंबा
दरम्यान, राज्यात मागील काही वर्षापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारला. त्यांनी शिवसेनेच्या जवळपास ४० आणि दहा अपक्ष आमदारांसह सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर अलिकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून सरकारमध्ये समाली होण्याचा निर्णय घेतला. याचा आरोप आता विरोधक भाजपवर करीत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा..भर पत्रकार परिषद चित्रा वाघांनी आणला विदूषक, ठाकरेंवर केला हल्लाबोल
हेही वाचा…भाजपने वंचितची मोठी फौज फोडली, असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल, जोरदार राजकीय हालचाली सुरू
हेही वाचा…शरद पवार गटाकडून धनंजय मुंडेंवर जहरी टिका, म्हणाले…,
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या सरकारला कडक ‘या’ पाच अटी, नाहीतर दिला अजून एक इशारा
हेही वाचा…“सगळे पक्ष एकमेकांची चामडी सोलत बसले नसते तर..,” वंचितच्या रेखा ठाकूर यांची जोरदार टिका