जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते दावे-प्रतिदावे करतांना दिसत आहेत. यातच पक्षाचा आदेश आला तर रावेत लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असं राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तर कुणी कितीही दावे केले तरी रावेत मतदारसंघ काॅंग्रेसकडेच राहणार असं काॅंग्रेसचे नेते उल्लास पाटील यांनी म्हटलं आहे. यावरून आता महाविकास आघाडीत मतदारसंघावरून रस्सीखेस सुरू होत आहे का ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…निवडणुकांसाठी ठाकरेंचा मेगा प्लॅन, ‘होऊ दे चर्चा’च्या उपक्रमातून मोदींवर हल्लाबोल, पहिलाच कार्यक्रम बारामतीत
इंडिया आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्षातील नेत्यांनी आदेश दिला तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रावेत मतदारसंघातून लढायला तयार असल्याचं खडसेंनी सांगितले. त्यावर एकनाथ खडसे यांच्या गोष्टीत काहीही तथ्य नाही आहे. रावेत लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचाच मतदार आहे. प्रत्येक गावोगावात काॅंग्रेस याठिकाणी आहे. त्यामुळे कोणी कितीही दावे केले तरी रावेतची जागा काॅंग्रेसचं लढणार आहे. असं उल्लास पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा…“शरद पवारांना बाप म्हणणारे आता मोदींना बाप समजतात”, काॅंग्रेसच्या आमदारानी रवी राणांना दाखवला कात्रजचा घाट
दरम्यान, राज्यात एका बाजूला महायुती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये जोरदार लढती होण्याची शक्यता आहे. परंतु या निवडणुकांमध्ये तिकीट वाटपावरून मोठा गोंधळ होणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात आरक्षण समाप्ती ? मागारवर्गीय जागे व्हा..!” जितेंद्र आव्हाडांचं मोठं आवाहन
हेही वाचा…“आरक्षण देण्याची दानत नसेल तर सांगा पण..,” शिंदेंच्या ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, ठाकरे गटाची टिका
हेही वाचा…“सरकारी कर्मचाऱ्यांच्या भरत्या आता कंत्राटी पद्धतीने,” खासदार अमोल कोल्हे सरकारवर भडकले
हेही वाचा…“धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे फडणवीस आता का आरक्षण देत नाहीत ?”
हेही वाचा…महायुतीतल समन्वय समितीची बैठकीत मोठा निर्णय, महाविकास आघाडीविरूद्ध रणशिंग फुंकलं