जालना : मराठा समाजासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंतरवाली सराटी गावात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांना फळांचं ज्युस पाजून उपोषण सोडलं आहे.
हेही वाचा…“राज्यातील शेती तोट्यात, निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली,” सरकार दुष्काळ का जाहीर करीत नाही?
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. यातच राज्य सरकारमधील शिष्टमंडळातील नेते अर्जून खोतकर, संदीपान भूमरे सातत्याने मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा करीत होते. मात्र आपल्या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील ठाम होते. यातच जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत.
हेही वाचा…“संभाजी भिडे उपोषणाच्या ठिकाणांहून अजित पवारांच्या काळजात घुसून आले”
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी जवळपास १८ पेक्षा अधिक दिवस उपोषण सुरू ठेवलं आहे. यातच मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला एक महिन्याचा कालावधी देण्यात यावा, असं म्हटलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी देखील राज्य सरकारला एक महिन्याचा अवधी दिला होता. त्यानंतर आज प्रत्यक्ष ठिकाणी मुख्यमंत्री दाखल झाले असून काय निर्णय घेणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…वाद आणखी चिघळला..! राणांच्या विरोधात यशोमती ठाकूर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार
हेही वाचा…४८ मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी, निवडणुकीपुर्वीच भाजपचा आराखडा तयार
हेही वाचा…फडणवीसांवर टिका, भाजप आक्रमक, शिंदे गटाच्या नेत्या म्हणाल्या “उद्धव ठाकरेंनीही तसं करावं”
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंशी पंगा, यशोमती ठाकूरांसोबत वाद, नवनीत राणांचा संघर्ष अटळ”
हेही वाचा…“खाजगी आयुष्यातलं मी..,” नितेश राणेंना इन्फ्लूएंझा व्हायरस डिटेक्ट झाला, काळजी घेण्याचं केलं आवाहन