मुंबई : शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जळगावाच्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टरबुज्या म्हणून उल्लेख केला. त्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.आता या वादावर विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओबाबत शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले, “त्यावेळीचा माईकवरील संवाद हा…,”
मला असं नेहमीच वाटतं की, त्या दोघांचं जे नातं आहे, ते लव्ह आणि हेटचं आहे. ते एकमेकांबद्दल प्रचंड द्वेषाने आणि त्वेषाने बोलतात. ते दोघेही खूप मोठे नेते आहेत, मतभेदाकडून मनभेदाकडे गेलंच आहे, पण ही चांगली गोष्ट नाही, यासंदर्भात, खंर सांगायचं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मी तेवढे अपशब्द ऐकले नाहीत.उद्धव ठाकरेंचा ठाकरी बाणा असल्यामुळे ते बोलत असतील. पण, बाळासाहेब रागवून बोलले तरी हसवून ते मिटवतही होते, उद्धव ठाकरेंनीही तसं करावं, असं मला वाटतं. असं गोऱ्हेंनी सांगितलं.
हेही वाचा…“अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे ‘नाकर्ते सरकार’ राज्याचा कारभार हाकताहेत”
दरम्यान, फडणवीसांवर टिका केल्यानंतर भाजपचे नेते ठाकरेंच्या विरोधात आक्रमक झालेत. काल पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर जहरी टिका केली. यावेळी त्यांना त्यांचा उल्लेख विदूषक करत पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी विदूषक देखील आणला. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंशी पंगा, यशोमती ठाकूरांसोबत वाद, नवनीत राणांचा संघर्ष अटळ”
हेही वाचा…“खाजगी आयुष्यातलं मी..,” नितेश राणेंना इन्फ्लूएंझा व्हायरस डिटेक्ट झाला, काळजी घेण्याचं केलं आवाहन
हेही वाचा…“राज्यातील शेती तोट्यात, निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली,” सरकार दुष्काळ का जाहीर करीत नाही?
हेही वाचा…“संभाजी भिडे उपोषणाच्या ठिकाणांहून अजित पवारांच्या काळजात घुसून आले”
हेही वाचा…अजित पवारांनी पुण्यासाठी स्पेशल घेतली मॅरेथॉन बैठक, आगामी निवडणुकीसाठी खास तयारी