मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांना चांगलचं भोवलं आहे. महाराष्ट्रात राज्यपालांविरोधात प्रचंड आक्रोश होत असून आता त्यांनीच महाराष्ट्रातून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांवर खोचक टोला हाणला होता. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
“देवेंद्र जरा जनाची नाही, तरी मनाची लाज बाळगा”; अन् उद्धव ठाकरेंनी ऐकवली फडणवीसांची जुनी क्लिप
राज्यपालांना अनेकदा भेटलो तेव्हा त्यांनी मला महाराष्ट्रातून पदमुक्त होण्याची इच्छा बोलून दाखविली होती. असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर राज्यपालांना परत जायचं आहे. याबाबतीत ते माझ्याशी बोलले, अशा प्रकारे अजित पवार यांनी बोलू नये. त्यांची आणि राज्यपालांची भेट नेमकी कधी झाली. हे त्यांनी आधी सांगावं. राज्यपालांंबाबत असं खोटं बोलणं योग्य नाही. असं मुंबई भाजपचे शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
“शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत, पण आमचं नवस अजून पुर्ण झालं नाही”; बच्चू कडू
अजित पवार हे चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत. ते विरोधी पक्षनेते आहेत. अशा प्रकारे बोलून ते स्व: ची उंची कमी करून घेत आहेत. त्यांनी उंचीचा विचार करून आणि भान ठेऊन बोलले पाहिजे. असं देखील आशिष शेलारांनी म्हटलं आहे. तसेच कसाबची फाशी रद्द करावी अशी माणी कऱणारा एकजण सोनिया गांधी यांचा निकटवर्तीय होता. सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. सत्तेसाठी कायपण हेच उद्धवजींचे धोरण असं म्हणत त्यांनी ठाकरेंनाही डिवचलं.
“गुणरत्ने सदावर्ते दारू पिऊन करतो की काय?” जितेंद्र आव्हांडाची खोचक प्रतिक्रिया
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी राज्यापालांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यातच उदयनराजे यांनी राज्यपालांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाठिंबा दिला आहे. उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचवल्या आहेत. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यात सरकार हस्तक्षेप करू शकतन नाही. असंही फडणवीस यांनी म्हटले आहे.
Read also
- राज्यपालांना पदमुक्त करण्याचे फडणवीसांकडून स्पष्ट संकेत, म्हणाले, “आम्ही देखील…;”
- “या मस्तवाल लोकांविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा”; राष्ट्रवादीची मागणी
- राजकीय वार….! काहींना जनाची नाही अन् मनाचीही नाही;” ठाकरेंच्या क्लिपला फडणीसांचं क्लिप उत्तर
- “ताई मोठ्या हुशार, थेट पंतप्रधानांना राखी बांधली अन्…;” उद्धव ठाकरेंनी भावना गवळींना डिवचलं
- “पंतप्रधान म्हणतात, मी दोन तीन किलो शिव्या खातो, पण शेतकऱ्यांचे काय?” उद्धव ठाकरेंचा खोचक टोला