पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच काल वर्षा बंगल्यावर शिवाजीराव आढळराव पाटलांसह अजित पवार, दिलीप वळसे पाटील, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. तर वर्षा बंगल्यावरून बाहेर पडतांना आढळराव पाटलांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. यातच असं राजकारण झालं तर मी राजकारणातून संन्यास घेऊन घरी बसणार असं अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहित पाटील यांनी म्हणत आढळराव पाटलांच्या पक्ष प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे.
शिवाजीराव आढळराव पाटलांना अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभेची उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा सुरू आहे. यावर अजित पवार गटातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांच्या विरोधात गेली २० वर्ष संघर्ष केला. तर असं राजकारण करण्यापेक्षा घरी बसणार. आढळराव पाटील राष्ट्रवादीत येतील, अशी नुसती चर्चा आहे. स्वागत करण्याचा जर तरचा प्रश्न आहे. त्यामुळे २० वर्ष आम्ही त्यांच्याविरोधात संघर्ष केला आहे. त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा घरी बसू. राजकारण हे तत्वाकरता व्हावं. असेही ते म्हणाले.
हेही वाचा….“ओबीसी आणि मुस्लिम एकत्र झाले तर आपण 48 पैकी 48 जागा जिंकु”, कुणी केला ‘हा’ मोठा दावा ? राज्यात तिसरी आघाडी ?
तसेच जर आयाराम गयारामाचं राजकारण झालं तर त्याला काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे पक्ष त्यांचं स्वागत करेल परंतु. वैयक्तिक जीवनात काय निर्णय घ्यायचा तो मला अधिकार आहे. माझ्या आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला आहे. मग त्यांच्यासोबत काम करण्याचा अधिकार मला असून लोकांना विचारून तो घेणार. त्यांनी माझ्यासोबत २० वर्ष खालच्या पातळीवर जाऊन संघर्ष केला आहे. हे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मग त्यांच्यासोबत राजकारण करण्यापेक्षा घरी बसणार. असा इशाराही त्यांनी दिलाय.
हेही वाचा…वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक, शिरूरची जागा राष्ट्रवादीच लढणार, महायुतीचा उमेदवार कोण ?
कर्जत येथील मेळाव्यात जाहीर विधान केल्यानंतर अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष केंद्रीत केलं. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात सातत्याने दौरे केले जात आहेत. यातच सध्या शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील, तसेच भाजपचे प्रदीप कंद आणि अजित पवार गटाकडून विलास लांडे निवडणुक लढण्यास इच्छूक आहेत. दोन टर्म खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांना पुणे म्हाडा अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांचा पत्ता कट होणार अशा चर्चा देखील रंगल्या आहेत.
परंतु दुसऱ्या बाजूला शिरूरची जागा राष्ट्रवादीकडेच राहण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवार गटात प्रवेश करावा आणि निवडणुक लढवावी, असा सुर देखील राष्ट्रवादी आणि महायुतीत बघायला मिळत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात कागदावर राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद अधिक दिसून येतेय. परंतु विद्यमान अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटलीच ठक्कर फाईट देऊ शकतात. अशी चर्चा देखील राष्ट्रवादीच्या गोटात सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा..चव्हाणांचं अस्तित्व अन् भाजपा गर्व मिटवण्यासाठी नांदेडमध्ये आखली रणनिती, खासदाराचीच बहिण कॉंग्रेसमध्ये दाखल ?
हेही वाचा…२३ जागांसाठी भाजपकडून निरिक्षक, मित्रपक्षांसमोर भाजपने टाकली गुगली, लोकसभेच्या ‘या’ जागा सोडल्या
हेही वाचा…शिरूर मावळला भरघोस निधी तर पिंपरी चिंचवड अन् पुणे शहाराला ठेंगा, अजित पवार पालकमंत्री असूनही…
हेही वाचा…शिंदेंच्याच मंत्री अन् खासदारामध्ये मोठा वाद, मोदींच्या सभेआधी भावना गवळी अन् राठोड यांच्यात बॅनरवॉर
हेही वाचा…मोदींच्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी १२ कोटी रूपयांचा चुराडा, विरोधकांची सरकारवर जोरदार टिका