पुणे : भाजपाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेश-गोव्यासह देशपातळीवरील निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यावरून टीका केली. फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी बोचरी टीका केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांची उंची आणि देशपातळीवरील काम पाहून नव्या पीढीने बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
…तर प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही; आशिष शेलारांच मुख्यमंत्र्यांना प्रत्यूत्तर
अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रापुरतं जे काही असेल ते मला विचारा, मी त्याचं उत्तर सडेतोडपणे देईल. देशाच्या राजकारणात आमचे वरिष्ठ बोलत असतात. कुणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहचलेला आहे. राजकारणाविषयी खूप काही बोलता येईल.
राजेश टोपेजी तुम्ही डॉक्टर आहात, मग इंदुरीकरांना दरवेळी का पाठीशी घालतायं? तृप्ती देसाई
“राजकीय जीवनात मला ३० वर्षे झाली. मला बारामतीकरांनी जरी खासदार म्हणून निवडून दिलं होतं, पण ६ महिन्यात मी परत आलो. शरद पवार यांना दिल्लीला जावं लागलं आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो. त्यानंतर मी कधीही महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो नाही. मी महाराष्ट्रात समाधानी आहे. माझं माझं काम चाललेलं आहे,” असं म्हणत अजित पवारांनी या घडामोडींवर सुरुवातीला बोलणं टाळलं.
Read also:
- दुकानांवरील मराठी पाट्यांना केवळ भाजप समर्थकांचा विरोध; मंत्री नवाब मलिकांचा आरोप
- राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब; काय घडलं नेमकं…
- तुम्ही कितीही करा हल्ला, पण मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला – महापौर किशोरी पेडणेकर
- आयुक्त इकबाल सिंह, यशवंत जाधव यांच्या रूपात महापालिकेत सचिन वाझे; आमदार अमित साटमांचा आरोप
- पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे; इच्छुकांना अजित पवारांना मोठा धक्का