मुंबई : महाराष्ट्रातील दुकानावर नामफलक हे मराठी भाषेत लावण्यात यावे, याबाबत सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. पंरतू, राज्यातील दुकाने आणि आस्थापनांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयाला भाजपच्या काही समर्थकांकडूनच विरोध केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मात्र, एकदा राज्य सरकारने कायदा केला की तो निर्णय सर्वांसाठी बंधनकारक असतो, असेही मलिक यांनी म्हटले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक; कडक निर्बंध लागणार? आज होणार निर्णय
नवाब मलिक म्हणाले, राज्य सरकारने दुकाने आणि १० पेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांवर मराठी भाषेत फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वांसाठी बंधनकारक आहे. पण विशेष वर्गातील लोक या निर्णयाला विरोध करत आहेत, ही बाब योग्य नाही. सरकारच्या प्रत्येक नियमाची अंमलबजावणी करणे हे नागरिक आणि संबंधित आस्थापनांचे कर्तव्य असते. परंतु, या निर्णयाला विशिष्ट भागातील भाजपचे समर्थक विरोध करताना दिसत आहेत. राज्यातील बहुतांश लोकांनी हा निर्णय स्वीकारला आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
…तर प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही; आशिष शेलारांच मुख्यमंत्र्यांना प्रत्यूत्तर
यावेळी नवाब मलिक यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसंदर्भातही भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसने मणीपूर, उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यापैकी मणीपूरमध्ये आमची काँग्रेसशी तर उत्तर प्रदेशात आम्ही समाजवादी पक्षासोबत युती केली आहे. गोव्यातील निर्णय अद्याप बाकी आहे. पण बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेस गेल्यावेळप्रमाणे स्वबळावरच लढेल, असे नवाब मलिक यांनी सांगितले. लवकरच पक्षाच्य माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर जबाबदाऱ्या दिल्या जातील, असेही मलिक यांनी म्हटले.
Read also:
- राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब; काय घडलं नेमकं…
- तुम्ही कितीही करा हल्ला, पण मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला – महापौर किशोरी पेडणेकर
- आयुक्त इकबाल सिंह, यशवंत जाधव यांच्या रूपात महापालिकेत सचिन वाझे; आमदार अमित साटमांचा आरोप
- पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे; इच्छुकांना अजित पवारांना मोठा धक्का
- राजेश टोपेजी तुम्ही डॉक्टर आहात, मग इंदुरीकरांना दरवेळी का पाठीशी घालतायं? तृप्ती देसाई