मुंबई : मुंबई महापालिकेच्या सुमारे ८० सेवासुविधा व्हॉट्सअॅपवर एका संदेशाद्वारे मिळू शकणार आहेत. पालिकेने याकरिता व्हॉट्सअॅप कंपनीच्या सहकार्याने नवीन सुविधा विकसित केली आहे. लोकाभिमुख अशा ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’ या सुविधेचे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना “प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही”, अशा शब्दात विरोधी पक्ष भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे दिसून आले.
तब्येत बरी होईपर्यंत उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा – चंद्रकांत पाटील
उद्दव ठाकरे म्हणाले,“काम न करताही बोलणारे लोक आहेत. पण आमचा कारभार उघड आहे, काही लपवत नाही, महापालिका नेमकी काय आहे, कसं काम करते हे समोर आलं पाहिजे. शेवटी आपलं काम बोलतं. शंका घेणारे अनेक आहेत, पण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही.”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले होते.
◆कोस्टलरोडच्या कामात 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा?
◆ मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले?
◆मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले?असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात,आम्ही ते विचारत राहू!
कारण…
प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही???
4/4— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 15, 2022
यावर आता भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्याच्या या विधानवरून ट्वीटद्वारे प्रश्नांची सरबत्ती करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.“गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का?, गेल्या २४ वर्षात २१ हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का?, ११४ टक्के नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते?, मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात २२ हजार ५०० कोटी खर्च करुन ही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा?, वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले?, मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले?,
आता एसटीमध्ये खासगी, सेवानिवृत्त चालक घेतले जाणार; व्यवस्थापकीय संचालकांची मोठी घोषणा
परिक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे?, ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे पुढे कसे?,मुंबईत गेल्या ११ वर्षात ४० हजार झाडांची बिल्डरांसाठी कत्तल केली, मग मुंबईकरांची मेट्रो कारशेडच का अडवून ठेवली?” अशा प्रकारे आशिष शेलार यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
Read also:
- पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक; कडक निर्बंध लागणार? आज होणार निर्णय
- पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? अजितदादा म्हणतात… मी आणि वळसे पाटील…
- सिंधुदुर्गमध्ये फक्त नारायण राणेंचीच हवा; जिल्हा बँकेतील ठाकरे, पवार, गांधी यांचे फोटो हटवले
- पार्थ पवारांनी घेतली अजित पवार यांची भेट; पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये तब्बल दोन तास खलबतं
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे “पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया उसके जैसा “; फडणवीसांनी पवारांना पुन्हा डिवचले