मुंबई : गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे. हा भ्रष्टाचार जवळपास दीड लाख कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे आम्ही यशवंत जाधव यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. मुंबई महानगरपालिकेत यशवंत जाधव, आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या रूपात सचिन वाझे बसले आहेत, असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा आणि तिळगुळ दिल्याशिवाय कोणतंही काम मार्गी लागत नाही. हे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ वर्षांच्या कार्यकाळात आता स्वीकारलं आहे.
पार्थ पवारांनी घेतली अजित पवार यांची भेट; पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये तब्बल दोन तास खलबतं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ही गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यामुळे आम्ही देखील त्यांच्यावर टीका टाळत होतो आणि करणारही नव्हतो. मात्र काळ त्यांनी केलेल्या टीकेमुळे आम्हाला आमची भूमिका बदलावी लागली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाचे श्रेय उद्धव ठाकरे घेत आहेत, अशी टीका अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. प्रभाकर शिंदे यांच्यासह इतर पाच सदस्यांनी एकत्र येऊन स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे पाठवण्यात देखील आला आहे.
सिंधुदुर्गमध्ये फक्त नारायण राणेंचीच हवा; जिल्हा बँकेतील ठाकरे, पवार, गांधी यांचे फोटो हटवले
स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर प्रभाकर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. शिंदे म्हणाले, २००६ साली जे टॅब ६ हजारांना दिले तेच टॅब २०१० साली १० हजारांना देण्यात आले. आता चालू वर्षांमध्ये हे टॅब २० हजारांना देण्यात आले आहेत. त्याबरोबरच २२५० कोटींच्या रस्त्यांचे प्रस्ताव कुणालाही विश्वासात न घेता पास केले. आजही रस्त्यांच्या दर्जांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र कोणतंही उत्तर आम्हाला मिळत नसल्यानं आम्ही आता अविश्वास ठराव दाखल केला आहे असं देखील प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे.
Read also:
- पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे; इच्छुकांना अजित पवारांना मोठा धक्का
- राजेश टोपेजी तुम्ही डॉक्टर आहात, मग इंदुरीकरांना दरवेळी का पाठीशी घालतायं? तृप्ती देसाई
- …तर प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही; आशिष शेलारांच मुख्यमंत्र्यांना प्रत्यूत्तर
- पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक; कडक निर्बंध लागणार? आज होणार निर्णय
- पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? अजितदादा म्हणतात… मी आणि वळसे पाटील…