मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीसह शिरूर, सातारा आणि रायगड लोकसभा लढविणार असल्याचं अजित पवारांनी कर्जत येथे झालेल्या चिंतन शिबिरात स्पष्ट केलं आहे. सध्या बारामती, शिरूर आणि सातारा लोकसभेतील खासदार शरद पवार गटात असून रायगड लोकसभेचा खासदार फक्त अजित पवार गटात असल्याने या जागांवर कुणाला उमेदवारी देणार ? अशी चर्चा सुरू आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी संवाद साधतांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…सुळे आणि कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट निवडणुक लढवणार ? अजित पवारांनी स्पष्ट केलं, उमेदवार कोण ?
मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी भारताची आणि महाराष्ट्राची नागरिक आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोण कुठून लढणार हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी मनापासून याचं स्वागत करते, कारम लोकशाही आहे. आमची नाती एका जागेवर आहेत आणि राजकारण वेगळं आहे. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा…“त्याचे काय डोळे गेले आहेत का ?” एकेरी उल्लख करत जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल
प्रोफेशन आणि नात्यात कधीच गल्लत करायची नसते. मी लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा केली आहे. लोकशाहीत कुणीतरी माझ्याविरोधाथ लढणारच आहे. यात काहीही गैर नाही. माझ्याविरोधात कुणीतरी लढलंच पाहिजे. हा आग्रह राहिला आहे. बाकी महाराष्ट्र आणि बारामतीतील मायबाप जनता ठरवेल. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“तर दोघांना खाली लोळवलं असतं”, जामीन मंजूर होताच दत्ता दळवींनी दिला इशारा
हेही वाचा…“जयंत पाटलांनी घाण करायची अन् अजित पवारांनी साफ करायची”, त्यामुळेच राष्ट्रवादीचा ‘हा’आमदार भडकला
हेही वाचा…आढळराव पाटील अजित गटात प्रवेश करणार अन् कोल्हेंच्या विरोधात निवडणुक लढणार ? लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणनिती ठरली
हेही वाचा…”नालायक” नाही तर मग काय सांगू ? उद्धव ठाकरेंकडून शिंदेंचा पुन्हा ”नालायक” उल्लेख
हेही वाचा…रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना मिळणार ? अजित पवारांनी दिले संकेत