मुंबई : आपल्या राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्या राज्याच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांना नालायक असा शब्द वापरला होता. तो त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. आता ह्या शेतकऱ्यांनी आपलं अवयव गहान ठेवले आहेत. मग त्यांना कोणता शब्द वापरायचा ? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा नालायक असा उल्लेख केला आहे. त्यावरून आता पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…शनिशिंगणापुर देवस्थानमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार, बावनकुळे, कराडांची उपोषणस्थळी भेट, म्हणाले…
गेल्या काही दिवसापासून आमचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. मोर्चे काढले जातात. आज देखील जिल्ह्याप्रमुख आणि तालुका प्रमुखांना जिल्ह्याधिकाऱ्यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत जाब विचारा. आधीचे पंचनामे कधी केले, नुकसान भरपाई कधी मिळणार ? पिक विमा हा घोटाळा आहे का ? असाही त्यांनी सवाल विचारला.
हेही वाचा…“मंत्री छगन भुजबळांना ठार मारण्याची धमकी, सलग १२ मॅसेज पाठवून..,” राजकारण तापणार
पुढे बोलतांना ते म्हणाले की, १ रूपयामध्ये पीक विमा मिळणार म्हणून साधारण ९० लाखांच्या आसपास शेतकरी पीक विमा घेत होते. आता तेच शेतकरी आता तीच संख्या पावने दोन काटीच्या घरात गेली आहे. शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी राज्य सरकारने जवळपास ८ हजार कोटी पीक विमा कंपन्याच्या घातलं आहे. आज सर्व पीक विमा कार्यालय बंद आहेत. त्यावर कोणतीही बंधनं घातली जात नाही मग हा पैसा कोणाच्या घरात गेला ? असा सवाल देखील ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची पीक कर्ज मुक्ती केली होती. आता परत त्यांच्यावर खर्च वाढला आहे.
हेही वाचा…मावळसाठी मीच उमेदवार असणार !श्रीरंग बारणेंनी जाहीर केली उमेदवारी, भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय ?
यातच आता पुन्हा एकदा सांगतो की, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या, नाही तर सर्वांना कर्जमुक्ती द्या. अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. तसेच आता सर्व शेतकऱ्यांनी सर्व विसरून एकत्रित उभं रहा आणि अन्नदात्याची ताकद काय असते ? ते सरकारला दाखवून द्या. यातच तुम्ही कोणताही अविचार करू नका. आत्महत्याचा तर विचार करूच नका. शिवसेना म्हणून मी तुमच्यासोबत आहे. त्यामुळे असा विचार करू नका. असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी अवयव विकण्यासाठी आलेल्या हिंगोली आणि वाशिम येथील शेतकऱ्यांना केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना मिळणार ? अजित पवारांनी दिले संकेत
हेही वाचा…सुळे आणि कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट निवडणुक लढवणार ? अजित पवारांनी स्पष्ट केलं, उमेदवार कोण ?
हेही वाचा…“त्याचे काय डोळे गेले आहेत का ?” एकेरी उल्लख करत जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल
हेही वाचा…लोकसभेच्या कोणत्या जागा लढविणार ? अजित पवारांनी सगळंच सांगितलं, म्हणाले…
हेही वाचा…जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी १३० जेसीबी तयार, १४० एकरवर सभा, पोलिस तैनात, जालन्यातील सभा वादळी ठरणार का ?