मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या तिकीटावरून सध्या अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच बघायला मिळत आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी आता आपल्या कामाचा लेखाजोखा मांडवा अन् मग त्यानंतर उमेदवारी सांगावी, असं म्हणत आमच्याच पक्षाची ताकद असून उमेदवारी आम्हाला मिळणार असा दावा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केला. त्यावर आता श्रीरंग बारणे यांनी सुनील शेळके यांच्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“तर थू तुमच्या जिंदगानीवर”, प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
माझी बांधिलकी ही जनतेशी असून, त्यांनी मला निवडून दिलेले असल्याने काय कामे केली, त्यांना सांगणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे केलेल्या कामाचा लेखाजोगा त्यांना देत आहे. जनतेची कामे केली आहेत. त्यामुळे कामाच्याच जोरावर पुन्हा निवडून येणार असं म्हणत २०२४ ला मावळ लोकसभा मतदारसंघात आपणच उमेदवार असल्याचा पुनर्रच्चार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
हेही वाचा…“अजितदादा भेकड नाही तर मग याची उत्तरं द्या,” शरद पवार गटाचे अजित पवार गटाला ‘१०’ तिखट सवाल
मोदी लाटेवर उमेदवारी मागणे व निवडून येणे आता सोपे राहिले नाही. २०१४ आणि २०१९ ला नरेंद्र मोदी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून मी निवडून आलो होतो. ते २०२४ ला पुन्हा लावणार. मोदींविषयी त्यांना द्वेष का ? असा सवाल करत श्रीरंग बारणे यांनी शेळकेंच्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…संजय राऊतांनी राहत इंदौरींचा ‘तो’ शेर केला पोस्ट, तर्क वितर्कांना उधाण
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दिल्लीतील बैठकीत आपली उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. सुनील शेळके यांच्याशी माझे चांगले संबंध असून वैयक्तिक वाद किंवा द्वेष नाही. त्यांना देखील मावळसाठी उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. परंतु दुसऱ्यांवर दोष देऊन पक्षासाठी वातावरण निर्मिती करणं योग्य नाही. असंही श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…शिरुरसाठी आंबेगाव ‘किंगमेकर’ : दोन दोस्त ठरवणार कोण होणार खासदार?
हेही वाचा…“..तर त्यांना भाजप तुकडे फेकणार नाही,” नितेश राणेंचा ‘बाडगा’ उल्लेख करत सुनील राऊतांची जहरी टिका
हेही वाचा…तेलंगणात काॅंग्रेस अन् बीआरएसमध्ये काटे की टक्कर, शिंदेंनी भाजपसाठी प्रचार केला, भाजपला किती जागा ? एक्झिट पोल आला समोर
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल आला समोर, भाजपला मोठा धक्का, काॅंग्रेसने उसंडी मारली
हेही वाचा…“..त्यामुळे विनाकारण अजित पवार गटाकडून चुकीची माहिती अयोगासमोर मांडली जातेय,” शरद पवार गटाचा आरोप